शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

३५ दिवसांत ७५ गावे ओडीएफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:32 IST

मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देअनुभव कथन कार्यशाळा : क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाटची फलश्रुती

ऑनलाईन लोकमतअमरावती : मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस मेळघाटातील विविध गावांमध्ये मुक्काम केला होता. बुधवार, ३१ जानेवारी रोजी या सर्वांनी सीईओ किरण कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यशाळेत अनुभव कथन केले.कार्यक्रमाला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक सी.एच वाकडे, मुख्य वनसंरक्षक हेमंत मिणा, आरडीसी नितीन व्यवहारे, के.एस. अहमद, विनय ठमके, संजय इंगळे, कैलास घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व अन्य अधिकारी उपस्थित होते.संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प सीईओ किरण कुलकर्णी यांनी केला. त्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारंवार बैठकी घेतल्या. १४ पैकी १२ तालुक्यांत बºयापैकी यशही आले; मात्र मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यात डिसेंबरअखेरीस १३ हजार ५२२ एवढे उद्दिष्ट शिल्लक होते. माघारलेल्या या दोन तालुक्यांत सीईओ किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून डेप्युटी सीईओ संजय इंगळे व त्यांच्या सहकारी चमूने नियोजन करताना ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ ही संकल्पना मांडली. यातून मेळघाटसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग घेत धारणीतील ९१ व चिखलदऱ्यातील २३ अशी ११४ गावे हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प सोडला. जि.प. पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनने राबविल्या या ३५ दिवसांच्या मोहिमेत ९७ पैकी ७५ गावे ओडीएफ केली आहेत. यासाठी झेडपीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेळघाटातील गावांमध्ये स्वत: पोहोचून तेथील नागरिकांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहीत केले. याशिवाय खड्डे खोदणे ते साहित्य उपलब्ध करून देण्यापर्यंत व गवंड्यांकडून बांधकाम पूर्ण करून घेण्यापर्यंतची कामे केली. येत्या फेब्रुवारीपर्यंत उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करून जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी सोडला.