शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

३५ दिवसांत ७५ गावे ओडीएफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:32 IST

मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देअनुभव कथन कार्यशाळा : क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाटची फलश्रुती

ऑनलाईन लोकमतअमरावती : मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस मेळघाटातील विविध गावांमध्ये मुक्काम केला होता. बुधवार, ३१ जानेवारी रोजी या सर्वांनी सीईओ किरण कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यशाळेत अनुभव कथन केले.कार्यक्रमाला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक सी.एच वाकडे, मुख्य वनसंरक्षक हेमंत मिणा, आरडीसी नितीन व्यवहारे, के.एस. अहमद, विनय ठमके, संजय इंगळे, कैलास घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व अन्य अधिकारी उपस्थित होते.संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प सीईओ किरण कुलकर्णी यांनी केला. त्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारंवार बैठकी घेतल्या. १४ पैकी १२ तालुक्यांत बºयापैकी यशही आले; मात्र मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यात डिसेंबरअखेरीस १३ हजार ५२२ एवढे उद्दिष्ट शिल्लक होते. माघारलेल्या या दोन तालुक्यांत सीईओ किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून डेप्युटी सीईओ संजय इंगळे व त्यांच्या सहकारी चमूने नियोजन करताना ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ ही संकल्पना मांडली. यातून मेळघाटसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग घेत धारणीतील ९१ व चिखलदऱ्यातील २३ अशी ११४ गावे हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प सोडला. जि.प. पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनने राबविल्या या ३५ दिवसांच्या मोहिमेत ९७ पैकी ७५ गावे ओडीएफ केली आहेत. यासाठी झेडपीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेळघाटातील गावांमध्ये स्वत: पोहोचून तेथील नागरिकांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहीत केले. याशिवाय खड्डे खोदणे ते साहित्य उपलब्ध करून देण्यापर्यंत व गवंड्यांकडून बांधकाम पूर्ण करून घेण्यापर्यंतची कामे केली. येत्या फेब्रुवारीपर्यंत उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करून जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी सोडला.