शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

३५ दिवसांत ७५ गावे ओडीएफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:32 IST

मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे.

ठळक मुद्देअनुभव कथन कार्यशाळा : क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाटची फलश्रुती

ऑनलाईन लोकमतअमरावती : मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस मेळघाटातील विविध गावांमध्ये मुक्काम केला होता. बुधवार, ३१ जानेवारी रोजी या सर्वांनी सीईओ किरण कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यशाळेत अनुभव कथन केले.कार्यक्रमाला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक सी.एच वाकडे, मुख्य वनसंरक्षक हेमंत मिणा, आरडीसी नितीन व्यवहारे, के.एस. अहमद, विनय ठमके, संजय इंगळे, कैलास घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व अन्य अधिकारी उपस्थित होते.संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प सीईओ किरण कुलकर्णी यांनी केला. त्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारंवार बैठकी घेतल्या. १४ पैकी १२ तालुक्यांत बºयापैकी यशही आले; मात्र मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यात डिसेंबरअखेरीस १३ हजार ५२२ एवढे उद्दिष्ट शिल्लक होते. माघारलेल्या या दोन तालुक्यांत सीईओ किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून डेप्युटी सीईओ संजय इंगळे व त्यांच्या सहकारी चमूने नियोजन करताना ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ ही संकल्पना मांडली. यातून मेळघाटसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग घेत धारणीतील ९१ व चिखलदऱ्यातील २३ अशी ११४ गावे हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प सोडला. जि.प. पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनने राबविल्या या ३५ दिवसांच्या मोहिमेत ९७ पैकी ७५ गावे ओडीएफ केली आहेत. यासाठी झेडपीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेळघाटातील गावांमध्ये स्वत: पोहोचून तेथील नागरिकांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहीत केले. याशिवाय खड्डे खोदणे ते साहित्य उपलब्ध करून देण्यापर्यंत व गवंड्यांकडून बांधकाम पूर्ण करून घेण्यापर्यंतची कामे केली. येत्या फेब्रुवारीपर्यंत उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करून जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी सोडला.