शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

अमरावती जिल्ह्यात आढळले ७४0 कर्करूग्ण

By admin | Updated: May 30, 2014 23:21 IST

जिल्हात तंबाखूजन्य आजारांचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या आरोग्य तपासणीत ७४0 रुग्ण कर्करोगाने ग्रस्त

अमरावती : जिल्हात तंबाखूजन्य आजारांचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या आरोग्य तपासणीत ७४0 रुग्ण कर्करोगाने ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असून महिलांमध्येही या रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. भारतात दरवर्षी ८५ हजार नागरिकांना कर्करोगाची लागण होत आहे. त्यामध्ये ५0 हजार नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण ३0 वर्षांवरील नागरिकांचे असून सद्यस्थितीत हे प्रमाण महिला व लहान मुलांमध्येही वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हात तबांखूचे व्यसन असणार्‍या नागरिकांची संख्या दिवसेंदिवसे वाढत आहे. गुटखाबंदी लागू झाल्यावरही जिल्हाभरात सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे. त्यामुळे गुटखा खाणार्‍यांचे प्रमाण वाढतच आहे.तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे सर्वांना माहिती असतानाही तंबाखूच्या व्यसनापासून नागरिकांची सुटका होत नसल्याचे आजही दिसून येत आहे. तंबाखूच्या व्यसनापासून अन्य काही आजारांची उत्पत्ती होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. यामध्ये रुग्णांच्या प्राथमिक तपासणीत मधुमेह, कर्करोग, हृदयरोग व अर्धांगवायू या रोगांची तपासणी केली जात आहे.  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालयात तसेच उपजिल्हा रुग्णालयांत ३0 वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात १0 ग्रामीण रुग्णालये व ४ उपजिल्हा रुग्णालयांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात एक मेडिकल ऑफिसर, एक परिचारिका, एक समुपदेशक व एक डाटा एन्ट्री ऑपरेटची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ लाख १८ हजार १५४ नागरिकांची तपासणी केली असता ३ हजार ९६९ रुग्ण संशयीत आढळून आले. त्यापैकी ७४0 रुग्णांना कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ४८७ पुरुष तर २५२ महिलांना कर्करोग निष्पन्न झाले आहे.