शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अमरावती जिल्ह्यात आढळले ७४0 कर्करूग्ण

By admin | Updated: May 30, 2014 23:21 IST

जिल्हात तंबाखूजन्य आजारांचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या आरोग्य तपासणीत ७४0 रुग्ण कर्करोगाने ग्रस्त

अमरावती : जिल्हात तंबाखूजन्य आजारांचा वाढता प्रभाव पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत झालेल्या आरोग्य तपासणीत ७४0 रुग्ण कर्करोगाने ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असून महिलांमध्येही या रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. भारतात दरवर्षी ८५ हजार नागरिकांना कर्करोगाची लागण होत आहे. त्यामध्ये ५0 हजार नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण ३0 वर्षांवरील नागरिकांचे असून सद्यस्थितीत हे प्रमाण महिला व लहान मुलांमध्येही वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हात तबांखूचे व्यसन असणार्‍या नागरिकांची संख्या दिवसेंदिवसे वाढत आहे. गुटखाबंदी लागू झाल्यावरही जिल्हाभरात सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे. त्यामुळे गुटखा खाणार्‍यांचे प्रमाण वाढतच आहे.तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे सर्वांना माहिती असतानाही तंबाखूच्या व्यसनापासून नागरिकांची सुटका होत नसल्याचे आजही दिसून येत आहे. तंबाखूच्या व्यसनापासून अन्य काही आजारांची उत्पत्ती होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. यामध्ये रुग्णांच्या प्राथमिक तपासणीत मधुमेह, कर्करोग, हृदयरोग व अर्धांगवायू या रोगांची तपासणी केली जात आहे.  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालयात तसेच उपजिल्हा रुग्णालयांत ३0 वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात १0 ग्रामीण रुग्णालये व ४ उपजिल्हा रुग्णालयांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात एक मेडिकल ऑफिसर, एक परिचारिका, एक समुपदेशक व एक डाटा एन्ट्री ऑपरेटची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ लाख १८ हजार १५४ नागरिकांची तपासणी केली असता ३ हजार ९६९ रुग्ण संशयीत आढळून आले. त्यापैकी ७४0 रुग्णांना कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ४८७ पुरुष तर २५२ महिलांना कर्करोग निष्पन्न झाले आहे.