शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जिल्ह्यात रबीची ७३ टक्के पेरणी

By admin | Updated: December 11, 2015 00:39 IST

गेल्या चार दिवसात वातावरणात बदल होवून थंडी वाढल्याने रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.

आठवड्यात २० टक्यांनी वाढ : सर्वाधिक ८४ हजार हेक्टर क्षेत्रात हरभरा अमरावती : गेल्या चार दिवसात वातावरणात बदल होवून थंडी वाढल्याने रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. या पैकी १ लाख ८ हजार १६४ हेक्टर क्षेत्रात ९ डिसेंबर पर्यंत पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ७३ टक्केवारी आहे. धारणी तालुक्यात १४ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी १२ हजार ४४८ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ८८ टक्केवारी आहे. चिखलदरा तालुक्यात ३ हजार १४० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी २ हजार ८६५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली, ही ९१ .३४ टक्केवारी आहे. अमरावती तालुका ८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी ५ हजार ९१० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. पेरणीची ३२ टक्केवारी आहे. भातकुली तालुका १८ हजार ४८० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. या पैकी ५ हजार ९१० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. पेरणीची ही ३२ टक्केवारी आहे. नांदगांव तालुका ६ हजार ५५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित पैकी ४ हजार ७२५हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली . ७२.१४ टक्केवारी आहे. चांदुररेल्वे तालुका ५ हजार १०३० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असतांना ५ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. पेरणीची ही ९७ टक्केवारी आहे. वरुड तालुक्यात ६ हजार ९३० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी ३ हजार ५३० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. ही ५०.९४ टक्केवारी आहे. दर्यापूर तालुक्यात २५ हजार ६५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी १७ हजार ८१९ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. अंजनगांव सुर्जी तालुक्यात १८ हजार ७७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. यापैकी ५ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी आटोपली आहे. ही ३१ टक्केवारी आहे. अचलपूर तालुक्यात ९ हजार २५० पेरणी पार पडली. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ८३ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात हरभरा व २४ हजार ३१ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे.