शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी नुकसानीचे ७३ कोटी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:07 IST

गतवर्षीच्या खरिपामध्ये बोंडअळीच्या संकटाने १ लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देमदतनिधीचा दुसरा हप्ता : पहिल्या हप्त्यामधील बाकी १२.१७ कोटी समाविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या खरिपामध्ये बोंडअळीच्या संकटाने १ लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे. यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये ६०.८६ कोटींऐवजी त्याच्या ८० टक्के म्हणजे ४८.७० कोटी शासनाने उपलब्ध केले. त्यातील बाकी १२.१७ कोटींसह दुसरा हप्ता ६०.८७ कोटी असे एकूण ७३.०४ कोटींचा निधी विभागीय आयुक्तांना प्राप्त झाला. पुढच्या आठवड्यात हा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.शासनाचे उपसचिव सु.ह. उमरानीकर यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ३३ टक्क्यांवर बाधित कपाशीचा संयुक्त स्वाक्षरीसह शेतकऱ्यांना मदतीसाठी आवश्यक निधीचा अहवाल मागितला. यासाठी बाधित पिकांत शेतकरी उभा असलेले ‘जीपीएस’ इनबिल्ट फोटो मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने काढण्यात आले. यामध्ये २ लाख २१ हजार ४१५ शेतकऱ्यांच्या २ लाख २२ हजार ५८६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १ लाख ९९ हजार १७२ हेक्टरमधील कपाशी बाधित झाले असल्याचे निष्पन्न झाले. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे या क्षेत्रासाठी १८२ कोटी ६० लाख ३ हजार ४९३ रुपयांची मागणी शासनाकडे केली. या बाधित कपाशीसाठी हेक्टरी ३० हजार ८०० रुपयांची मदत देण्याची घोषणा तत्कालिन कृषिमंत्र्यांनी २३ डिसेंबरला नागपूर विधिमंडळात केली. प्रत्यक्षात फक्त एनडीआरएफची हेक्टरी ८,५०० रुपयांप्रमाणे मदत मिळत आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांकडून हेक्टरी १६ हजार व विम्याचे हेक्टरी आठ हजार रुपये अशी मदतीची घोषणा शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसणारीच ठरली आहे. कपाशी विम्यात अर्धेअधिक शेतकऱ्यांना डावलण्यात आले, तर बियाणे कंपन्याकडून मदतीचा खुद्द कृषिमंत्र्यांनाच विसर पडला आहे. एनडीआरएफचीे मदतदेखील तीन हप्त्यांमध्ये देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.मदतनिधीमधून कर्जकपात नाहीमदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या निधीमधून कोणतीही कर्जकपात करता येणार नाही. लाभार्थींची यादी त्यांना वाटप निधीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यास हा निधी समान तीन हप्त्यांमध्ये देण्यात येत असला तरी शेतकºयांना अनुज्ञेय असणारी रक्कम एकाच वेळी मिळेल.बँक खाते आधारसंलग्न आवश्यकशेतकऱ्यांच्या आधारशी संलग्न खात्यांमध्ये डीबीटीने निधी प्रदान करण्यात येणार आहे. एखाद्याकडे आधार क्रमांक नसल्यास निवडणूक ओळखपत्र, आधार पावती, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पारपत्र वा बँकेच्या पुस्तिकेची खातरजमा करून प्रदान करण्यात यावी, असे ८ मेच्या शासनादेशात स्पष्ट केले.