शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

चार नगरपंचायतींसाठी ७२.११ टक्के मतदान

By admin | Updated: November 2, 2015 00:24 IST

जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली येथे नगर पंचायत निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

अमरावती : जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली येथे नगर पंचायत निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. धारणीत ६४. ३१, भातकुलीत ७९.३०, तिवसा ६९.८३ तर नांदगाव खंडेश्वर येथे ७५ टक्के मतदान झाले. चारही नगरपंचायतींसाठी सरासरी ७२.११ टक्के मतदान झाले. भातकुलीत मतदानादरम्यान थोडा गोंधळ उडाला होता. परंतु इतर तीन ठिकाणी शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली.तिवस्यात ६९.८३ टक्के मतदानतिवसा : तिवसा नगरपंचायतीसाठी रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १७ प्रभागांसाठी ९१ उमेदवार रिंंगणात होते. ११ हजार ५८५ मतदारांपैकी ८ हजार ९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ४ हजार २८८ पुरुष, तर ३ हजार ९४२ महिलांचा समावेश आहे. सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. दुपारनंतर मतदानाचा वेग चांगलाच वाढला होता. येथे अतिशय शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पडले. नगर पंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान झाल्याने युवकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. (प्रतिनिधी)धारणीत ६४.३१ टक्के मतदानधारणी : नगरपंचायत निवडणुकीत ६४.३१ टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला. प्रभाग क्र. ३,१०,१२,१४ येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा होती. सुरुवातीला पाचशे रुपये असलेली मतदाराची किंमत शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ७ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जात होते. रोखऐवजी मागणीप्रमाणे मतदारांच्या घरापर्यंत 'भेटवस्तू' पोहोचविण्यात आल्याचीसुध्दा चर्चा होती. नांदगावात १२० उमेदवारांचे भाग्य पेटीबंदनांदगावखंंडेश्वर : येथे नगर पंचायतीच्या १७ प्रभागांसाठी शांततेत निवडणूक पार पडली. सुमारे १० हजार ७३ मतदारांपैकी ७ हजार ५५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७५ आहे. प्रभाग क्र. १ मध्ये एकूण मतदार ५१८ होते. त्यापैकी ४१७ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८०.५० टक्के इतकी आहे. प्रभाग क्र. २ मध्ये एकूण ७४२ पैकी ५६६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.