शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

७२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. प्रथमच थेट सरपंच निवडून येणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्ह्यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले. यादरम्यान तुरळक घटना वगळता कुठेही अप्रिय घटना घडल्याची नोंद नाही.सरपंच व सदस्यपदांसाठी रिंगणात असलेल्या ४२८१ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये बंद झाले. यात सरपंचपदाचे ९८२, ...

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : उशिरापर्यंत केंद्रांमध्ये गर्दी, थेट सरपंचांमुळे चुरस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. प्रथमच थेट सरपंच निवडून येणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्ह्यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले. यादरम्यान तुरळक घटना वगळता कुठेही अप्रिय घटना घडल्याची नोंद नाही.सरपंच व सदस्यपदांसाठी रिंगणात असलेल्या ४२८१ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये बंद झाले. यात सरपंचपदाचे ९८२, तर सदस्य पदांसाठी ३२९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी सकाळी १० वाजतापासून संबधित तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू होणार आहे.जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींच्या ७९२ प्रभागातील १४६१ सदस्य व २४९ सरपंचपदासाठी सोमवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान झाले. काही केंद्रांवर निर्धारित वेळेपर्यंत मतदान पूर्ण न झाल्याने मतदान केंद्रात उशिरापर्यंत मतदारांची गर्दी होती. या निवडणुकीसाठी १ लाख ६६ हजार १६५ पुरुष व १ लाख ५० हजार ८८२ स्त्री व इतर चार असे एकूण ३ लाख १७ हजार ५१ मतदार होते. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या कालावधीत ६२ हजार ८२८ स्त्री, ७० हजार ३२८ पुरुष असे एकूण १ लाख ३३ हजार १५६ मतदारांनी मतदान केले. ही ४२ टक्केवारी होती.मतदारांचा ओघ वाढल्याने दुपारी ३.३० पर्यंत ९२,१६० स्त्री व ९७,४०७ पुरुष असे एकूण १ लाख ८९ हजार ५६७ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ५९.७९ अशी होती. मतदानाची निर्धारित वेळ सायंकाळी ५.३० पर्यंत असताना केंद्रांवर मतदारांची गर्दी असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते.अचलपूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानात सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याचे संबधित अधिकाºयांनी सांगितले. धामणगाव रेल्वे तालुक्यात ८ ग्रामपंचायतीत झालेल्या मतदानाची टक्केवारी ८६.०३ टक्के होती. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७५ टक्के, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १७ पैकी १६ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी ७९.०१ टक्के , दर्यापूर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींसाठी ८६ टक्के मतदान झाले. वरूड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींसाठी ८०.८१ टक्के, मोर्शी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७६ टक्के, तिवसा तालक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के, चांदूर बाजार तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी ८१.१० टक्के, चांदूर रेल्वे तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के, अमरावती तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ७५ टक्के, भातकुली तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ७८ टक्के , धारणी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान झाले. चिखलदरा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या मतदानाची आकडेवारी मिळाली नाही.६.३० पर्यंत मतदान प्रक्रियाचांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा व घाटलाडकी येथे सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. ५.३० वाजता केंद्राचे दरवाजे बंद करुन मतदान झाले.