शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

७१ उपसा जलसिंचन योजना मोडकळीस

By admin | Updated: December 21, 2014 22:52 IST

विदर्भातील उपसा जलसिंचन सहकारी संस्थेच्या भागधारक शेतकऱ्यांवर असलेले १०६ कोटी रुपये कर्ज माफ व्हावे, याकरीता शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करुनही काहीच प्राप्त न झाल्यामुळे तब्बल ७२ उपसा

प्रशांत काळबेंडे - जरुडविदर्भातील उपसा जलसिंचन सहकारी संस्थेच्या भागधारक शेतकऱ्यांवर असलेले १०६ कोटी रुपये कर्ज माफ व्हावे, याकरीता शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करुनही काहीच प्राप्त न झाल्यामुळे तब्बल ७२ उपसा जलसिंचन योजनेपैकी केवळ वरुड तालुक्यात जरुड येथील शरद उपसा जलसिंचन योजना सुरु आहे. ७१ उपसा जलसिंचन योजना संपूर्णत: मोडकळीस आल्या असून ४ हजार शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून विदर्भात तब्बल ७२ उपसा जलसिंचन योजना कार्यान्वीत केल्या. यामुळे ४० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. परंतु १९९२ पासून कार्यान्वित झालेल्या उपसा जलसिंचन योजना दिवसागणिक बंद पडू लागल्याने कर्जाचे ओझे वाढत गेले. सुमारे ४ हजार शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोझा वाढला. पर्यायाने अनेक शेतकऱ्यांनी सिंचनाचा ध्यास सोडून शेती गहाण ठेवली. तर काहींची शेती सावकारांच्या घशात गेली. सिंचनासाठी घेतलेले कर्ज माफ व्हावे याकरीता शासनाचे अनेक वेळा उंबरठे झिजविले. मात्र, आश्वासनांखेरीज काहीच मिळाले नाही. शासनाने २ फेब्रुवारी २०१० रोजी विदर्भ व उर्वरीत महाराष्ट्र असा भेदाभेद करुन नाशिक विभागाकरीता संपुर्ण कर्जमाफी आणि विदर्भातील शेतकऱ्यांना केवळ २० हजार रुपये माफी असा भेदाभेद केल्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. हा अन्याय दूर करण्याच्या उद्देशाने जरुड येथील शरद उपसा जलसिंचन योजनेतील पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निदर्शनास हा भेद आणून दिला. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१० ला झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील सहकारी उपसा सिंचन योजनेसाठी कर्जमाफी व कर्जसवलत योजने अंतर्गत ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी निश्चित करण्यात आली. यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या ६४ उपसा जलसिंचन संस्थेची ११८ कोटी रुपये वगळून उर्वरीत ३८२ कोटीचे उपसा जलसिंचन कर्ज माफिचे प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय झाला. परंतु मंत्रीमंडळाचा हा निर्णय हवेतच विरला. जरुड येथील शरद उपसा जलसिंचन योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक पाठबळातून कशीबशी सुरु आहे. पाण्याचे दुर्भीक्ष्य लक्षात घेवून आपल्या संत्रा बागा आपल्या डोळयांदेखत वाळत आहेत.हे पाहून जरुड येथे शरद उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी ७४५ शेतकऱ्यांनी एकत्र येवून त्यांची शेती जिल्हा बँकेसह नाबार्डकडे गहाण ठेवून १९९४ मध्ये तब्बल ८ कोटी रुपये कर्ज उचलून १३ किमी लांबीवरुन ७५ मीटर उंचीवर १६८० अश्वशक्ती विद्युत संयंत्राच्या मदतीने जरुड परिसरात पाणी आणून संत्राबागा वाचविल्या. विदर्भातून एकमेव शरद उपसा योजना आजही सुरळीत सुरु आहे.परंतु इतक्या कमी खर्चात शेतकऱ्यांनी केलेल्या योजनेची दखल न घेता. त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर सतत वाढत जात आहे. एकीकडे सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस येत असून योजना बंद पडल्या आहे. अधिवेशनात विदर्भातील शेतकऱ्यांची व्यथा कुणी ऐकणार काय? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.