शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

७०८ गावे पाणी टंचाईच्या छायेत

By admin | Updated: February 4, 2016 00:13 IST

फेब्रुवारीच्या सुरुवातीसच जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील तब्बल ७०८ गावात पाणी टंचाईचे संकेत असून टंचाई ...

उपाययोजना : जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग सज्ज अमरावती : फेब्रुवारीच्या सुरुवातीसच जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील तब्बल ७०८ गावात पाणी टंचाईचे संकेत असून टंचाई निवारणार्थ प्रशासनाने सुमारे १० कोटी २३ लाख रुपयांचा कृती आराखडा मंजूर केला अहे. संभाव्य पाणी टंचाई हाताळण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्याच्या काही भागात या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी जिल्ह्यातील तब्बल ७० गावांना पाणी टंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजनेस सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात नवीन विंधन विहीर घेण्याबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्या गावांमध्ये ७२६ उपाययोजना आराखड्यात सूचविण्यात आल्या आहेत. यंदाचा कृती आराखडा १० कोटी २३ लाख रुपयांचा असून जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत ३१७ उपाययोजना त्या अंतर्गत करण्यात येणार आहेत. चिखलदऱ्यासह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ही आहेत टँकरग्रस्त गावेदरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधील सहा गावात पाणीटंचाई भासते. त्यामुळे ढोमणी फाटा, हत्तीघाट, खडिमल, मोथाखेडा, तारूबांदा व आवागड या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. सध्या केवळ खडीमल गावातच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ पाणी पुरवठा विभागाने आवश्यक तयारी केली आहे. सध्या केवळ एकाच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ज्या ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास पाणी पुरवठा विभागाने खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.-संजय येवले, उपकार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद.