शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

७०८ गावे पाणी टंचाईच्या छायेत

By admin | Updated: February 4, 2016 00:13 IST

फेब्रुवारीच्या सुरुवातीसच जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील तब्बल ७०८ गावात पाणी टंचाईचे संकेत असून टंचाई ...

उपाययोजना : जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग सज्ज अमरावती : फेब्रुवारीच्या सुरुवातीसच जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील तब्बल ७०८ गावात पाणी टंचाईचे संकेत असून टंचाई निवारणार्थ प्रशासनाने सुमारे १० कोटी २३ लाख रुपयांचा कृती आराखडा मंजूर केला अहे. संभाव्य पाणी टंचाई हाताळण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्याच्या काही भागात या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी जिल्ह्यातील तब्बल ७० गावांना पाणी टंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजनेस सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात नवीन विंधन विहीर घेण्याबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्या गावांमध्ये ७२६ उपाययोजना आराखड्यात सूचविण्यात आल्या आहेत. यंदाचा कृती आराखडा १० कोटी २३ लाख रुपयांचा असून जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत ३१७ उपाययोजना त्या अंतर्गत करण्यात येणार आहेत. चिखलदऱ्यासह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ही आहेत टँकरग्रस्त गावेदरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधील सहा गावात पाणीटंचाई भासते. त्यामुळे ढोमणी फाटा, हत्तीघाट, खडिमल, मोथाखेडा, तारूबांदा व आवागड या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. सध्या केवळ खडीमल गावातच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ पाणी पुरवठा विभागाने आवश्यक तयारी केली आहे. सध्या केवळ एकाच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ज्या ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास पाणी पुरवठा विभागाने खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.-संजय येवले, उपकार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद.