शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

७०० आदिवासींना आज काढणार जंगलाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:24 IST

मेळघाटातील आदिवासींचे नेता राजकुमार पटेल यांना विश्वासात घेऊन जंगलात शिरलेल्या हजारेक आदिवासींना जंगलाबाहेर आणा,....

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आदेश : जिल्हाधिकारी, एसपी पोहोचणार; पटेलांना सोबत घेण्याच्या सूचना, राणांचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतअमरावती : मेळघाटातील आदिवासींचे नेता राजकुमार पटेल यांना विश्वासात घेऊन जंगलात शिरलेल्या हजारेक आदिवासींना जंगलाबाहेर आणा, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत.व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील सोमठाणा खुर्द, सोमठाणा बुजरूक, धारगड, अमोना, केलपानी, गुल्लरघाट, नागरतास, बारूखेडा या आठ गावांत वास्तव्यास असलेल्या आदिवासी महिला-पुरुषांना जंगलातून काढून तेल्हारा आणि अकोट तालुक्यांतील पुनर्वसनस्थळी आणावे, अशी योजना जिल्हा प्रशासनाची होती. तसे केलेही गेले. सुमारे ७०० आदिवासींना पुनर्वसित केले गेले; तथापि शासनाने तीन वर्षांत शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, रस्ते, मुबलक पाणी, रोजगार, आरोग्य यापैकी एकही सुविधा न दिल्याने आदिवासी अस्वस्थ झाले. आजार वाढू-जडू लागले. तरणीताठी मुले पटापट मरून पडली. पुनर्वसित गाव सोडण्याचा निर्णय अदिवासींनी घेतला. ते पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासस्थळी पोहोचले. बंडाचे निशाण फडकविलेल्या आदिवासींना समजविताना प्रशासनाची त्यावेळी चांगलीच दमछाक झाली होती. आदिवासी नेता राजकुमार पटेल यांनी त्यावेळी प्रशासनाची विनंती मान्य करून आदिवासींना शांत केले होते. सुविधा निर्मितीच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही स्थिती तीच असल्याने तिनेक महिन्यांपूर्वी आदिवासी पुन्हा जंगलात शिरले. त्यांची मूळ निवासस्थाने नष्ट करण्यात आल्यामुळे आता ते उघड्यावर राहत आहेत. रात्रीचे तपमान दोन अंशांपर्यंत उतरू लागले आहे. त्या परिसरात वाघाचेही दर्शन झाले आहे. आदिवासी बांधवांच्या जीविताला त्यामुळे गंभीर धोका उत्पन्न झाला आहे. अप्रिय घटना घडू नये, यासाठी आदिवासींना जंगलाबाहेर आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आदिवासी मानतात की अधिकाºयांना भारी पडतात, हे सोमवारी कळेलच.मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार यांना राजकुमार पटेल यांच्यासंबंधाने कडक शब्दांत सुनावले. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंबंधी आणि पोलीस कारवाईच्या शैलीविषयी त्यांनी नाखुशी दर्शविली.मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरून मी प्रशासनाला यापूर्वीही मदत केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मला मुद्दामच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविले. आता तर हद् झाली. घटनेशी दूरदूरचा संबंध नसलेले माझे नातेवाईकही शोधून-शोधून गुन्ह्यांत अडकविले. पोलिसांनी खोटे गुन्हे मागे घ्यावे आणि मगच मला मदत मागावी.- राजकुमार पटेल,माजी आमदार, मेळघाटआदिवासींचे हाल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविले. त्यांनी कलेक्टर, एसपीला आदेश दिले. राजकुमार पटेलांना सोबत घेण्याच्या सूचना केल्यात. आम्ही सर्व सोमवारी जंगलात जाऊ, आदिवासींना बाहेर आणू.- रवि राणा,आमदार, बडनेरा