शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

७०० आदिवासींना आज काढणार जंगलाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:24 IST

मेळघाटातील आदिवासींचे नेता राजकुमार पटेल यांना विश्वासात घेऊन जंगलात शिरलेल्या हजारेक आदिवासींना जंगलाबाहेर आणा,....

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आदेश : जिल्हाधिकारी, एसपी पोहोचणार; पटेलांना सोबत घेण्याच्या सूचना, राणांचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतअमरावती : मेळघाटातील आदिवासींचे नेता राजकुमार पटेल यांना विश्वासात घेऊन जंगलात शिरलेल्या हजारेक आदिवासींना जंगलाबाहेर आणा, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत.व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील सोमठाणा खुर्द, सोमठाणा बुजरूक, धारगड, अमोना, केलपानी, गुल्लरघाट, नागरतास, बारूखेडा या आठ गावांत वास्तव्यास असलेल्या आदिवासी महिला-पुरुषांना जंगलातून काढून तेल्हारा आणि अकोट तालुक्यांतील पुनर्वसनस्थळी आणावे, अशी योजना जिल्हा प्रशासनाची होती. तसे केलेही गेले. सुमारे ७०० आदिवासींना पुनर्वसित केले गेले; तथापि शासनाने तीन वर्षांत शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, रस्ते, मुबलक पाणी, रोजगार, आरोग्य यापैकी एकही सुविधा न दिल्याने आदिवासी अस्वस्थ झाले. आजार वाढू-जडू लागले. तरणीताठी मुले पटापट मरून पडली. पुनर्वसित गाव सोडण्याचा निर्णय अदिवासींनी घेतला. ते पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासस्थळी पोहोचले. बंडाचे निशाण फडकविलेल्या आदिवासींना समजविताना प्रशासनाची त्यावेळी चांगलीच दमछाक झाली होती. आदिवासी नेता राजकुमार पटेल यांनी त्यावेळी प्रशासनाची विनंती मान्य करून आदिवासींना शांत केले होते. सुविधा निर्मितीच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही स्थिती तीच असल्याने तिनेक महिन्यांपूर्वी आदिवासी पुन्हा जंगलात शिरले. त्यांची मूळ निवासस्थाने नष्ट करण्यात आल्यामुळे आता ते उघड्यावर राहत आहेत. रात्रीचे तपमान दोन अंशांपर्यंत उतरू लागले आहे. त्या परिसरात वाघाचेही दर्शन झाले आहे. आदिवासी बांधवांच्या जीविताला त्यामुळे गंभीर धोका उत्पन्न झाला आहे. अप्रिय घटना घडू नये, यासाठी आदिवासींना जंगलाबाहेर आणण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आदिवासी मानतात की अधिकाºयांना भारी पडतात, हे सोमवारी कळेलच.मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार यांना राजकुमार पटेल यांच्यासंबंधाने कडक शब्दांत सुनावले. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंबंधी आणि पोलीस कारवाईच्या शैलीविषयी त्यांनी नाखुशी दर्शविली.मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरून मी प्रशासनाला यापूर्वीही मदत केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मला मुद्दामच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविले. आता तर हद् झाली. घटनेशी दूरदूरचा संबंध नसलेले माझे नातेवाईकही शोधून-शोधून गुन्ह्यांत अडकविले. पोलिसांनी खोटे गुन्हे मागे घ्यावे आणि मगच मला मदत मागावी.- राजकुमार पटेल,माजी आमदार, मेळघाटआदिवासींचे हाल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविले. त्यांनी कलेक्टर, एसपीला आदेश दिले. राजकुमार पटेलांना सोबत घेण्याच्या सूचना केल्यात. आम्ही सर्व सोमवारी जंगलात जाऊ, आदिवासींना बाहेर आणू.- रवि राणा,आमदार, बडनेरा