शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

७०० संत्राझाडे आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:13 IST

पान २ ची लिड बेनोडा परिसरात भीषण आग, लक्षावधी रुपयांचे नुकसान बेनोडा शहीद : परिसरातील महादेव चौधरी यांच्या ...

पान २ ची लिड

बेनोडा परिसरात भीषण आग, लक्षावधी रुपयांचे नुकसान

बेनोडा शहीद : परिसरातील महादेव चौधरी यांच्या संत्राबागेत लागलेल्या आगीत त्यांच्या मालकीची ६६३ व विजय वाघ यांची ३५ संत्राझाडे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

नागझिरी मौजा शिवारात महादेव चौधरी यांत्या मालकीच्या सर्व्हे नंबर १२५ या शेतात दुपारी २ वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत त्यांच्या एकूण १.६२ हेक्टर क्षेत्रापैकी १.२२ हेक्टरवरील ६६३ संत्राझाडे आगीच्या भक्षस्थानी सापडली. या संपूर्ण झाडांवर मोठ्या प्रमाणात आंबिया बहराची संत्राफळे होती. त्या फळांचाही आगीत कोळसा झाला. शेतातील ठिबक सिंचन संचसुद्धा आगीत जळाला. यावर्षी मृगबहर मुबलक प्रमाणात नसल्याने त्यांनी गव्हाचे पीक घेतले होते. नुकताच गहू घरी नेल्याने तो वाचला. मात्र, जनावरांच्या चाऱ्यासाठीच्या दोन गवंडाच्या गंजी खाक झाल्यात. काढणीनंतरचा शिल्लक गव्हाचा पालापाचोळा शेतात असल्याने आग अनियंत्रित झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडीने आग विझविण्यासाठी कसरत केली. मात्र, आगीचा विळखा मोठा असल्याने त्यांना उशीर लागला आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गतवर्षीच्या दुष्काळात महत्प्रयासांनी जगविलेली बाग आगीत भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे दु:ख अनावर झाले.

संयुक्त प्रयत्न तोकडे

अग्निशमन दलाच्या आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या मेहनतीने पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत महादेव चौधरी यांची संत्राफळांसह संत्राझाडे, ठिंबक संच, गवंड्याच्या दोन गंज्या, शेजारच्या वाघ यांच्या शेतातील ३५ संत्राझाडे, सचिन धुमटकर यांची धुऱ्यावरील पाईपलाईन असे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच बेनोडा पोलिसांनी ताफा पाठवून आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. महसूल विभागाच्यावतीने तलाठी दीक्षा गोडबोले व कृषी सहायक मुनेश्वर कुबडे यांनी पंचनामा केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई शासन - प्रशासनाने तातडीने देऊन दिलासा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

एकाच महिन्यातील बेनोड्यातील ही तिसरी आग

यापूर्वी बेनोड्यातील बर्डी परिसरातील मंदिराच्या मालकीच्या शेतात लागलेल्या आगीत जनावरांचा चारा जळून खाक झाला होता. मागील आठवड्यात मांगोना मौजातील भुपेश शर्मा यांच्या शेतातील आंबिया बहरासह १६५ मोठी संत्राझाडे व क्षेत्रातील काढणीस आलेला संपूर्ण गहू जळून खाक झाला होता. या दोन्ही आगी विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागल्या होत्या, हे विशेष.