शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७० टक्के गावांत राजकारण पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य निवडले जाणार आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक विभाग लागला कामाला : ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ५३१९ जागांसाठी घमासान, ५० टक्के महिला राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य निवडणूक आयोगाद्वारे ५२६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ७० टक्के गावांमध्ये राजकारण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर सरपंचपदाचे आरक्षणाची तारीख जाहीर झालेली नसल्याने निवडणूक विभागासह इच्छुकांची प्रतीक्षा ताणली आहे.जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य निवडले जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात एक हजार सदस्य, अनुसूचित जमाती प्रवर्गात १२०१, नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये ११७० व सर्वसाधारण प्रवर्गात १९४८ सदस्य निवडले जातील. यामध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये १४ लाख ४३ हजार ६८३ लोकसंख्या आहे. यामध्ये २ लाख ४८ हजार ९८३ अनुसूचित जाती व ३ लाख ३७ हजार ७९१ लोकसंख्या ही अनुसूचित जमाती प्रवर्गाची आहे. जिल्हा निवडणूक विभागाद्वारे ही सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाला व ग्रामविकास विभागाला ५ फेब्रुवारीला पाठविण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही सरपंचपदाचे आरक्षण काढण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नसल्याने गावागावांत प्रतीक्षा होत आहे.सरपंचपदाचे निवडीबाबत चर्चेला उधाणआयोगाने शासन अधिसुचना १३ आॅगस्ट २०१८ चा संदर्भ देऊन थेट जनतेमधून सरपंच निवडल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मंगळवारी विधानसभेत ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडीचा प्रस्ताव पारीत केला असल्याने पुन्हा सदस्यांमधून सरपंच निवडले जाणार असल्याचे मेसेज दिवसभर व्हायरल झाल्याने संभ्रम होता. यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागासी संपर्क साधला असता, याविषयी कुठलेच आदेश नसल्याचे सांगण्यात आले.शिवरात शेतकरी व्यस्तगावागावातील निवडणुकीचा कार्यक्रम दीड महिना राहणार आहे. मात्र, याच काळात शिवारांमध्ये हरभऱ्याची सवंगणी व मळणीचा हंगाम राहणार असल्याने शेतकरी व्यस्त राहणार आहे. संपर्क साधताना उमेदवारांची कसरत होणार आहे.

टॅग्स :sarpanchसरपंच