शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७० टक्के गावांत राजकारण पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य निवडले जाणार आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक विभाग लागला कामाला : ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ५३१९ जागांसाठी घमासान, ५० टक्के महिला राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य निवडणूक आयोगाद्वारे ५२६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील ७० टक्के गावांमध्ये राजकारण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर सरपंचपदाचे आरक्षणाची तारीख जाहीर झालेली नसल्याने निवडणूक विभागासह इच्छुकांची प्रतीक्षा ताणली आहे.जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५२६ ग्रामपंचायतींमध्ये ६ मार्चपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत १ हजार ९७२ प्रभागांतून ५ हजार ३१९ सदस्य निवडले जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात एक हजार सदस्य, अनुसूचित जमाती प्रवर्गात १२०१, नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये ११७० व सर्वसाधारण प्रवर्गात १९४८ सदस्य निवडले जातील. यामध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये १४ लाख ४३ हजार ६८३ लोकसंख्या आहे. यामध्ये २ लाख ४८ हजार ९८३ अनुसूचित जाती व ३ लाख ३७ हजार ७९१ लोकसंख्या ही अनुसूचित जमाती प्रवर्गाची आहे. जिल्हा निवडणूक विभागाद्वारे ही सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाला व ग्रामविकास विभागाला ५ फेब्रुवारीला पाठविण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही सरपंचपदाचे आरक्षण काढण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नसल्याने गावागावांत प्रतीक्षा होत आहे.सरपंचपदाचे निवडीबाबत चर्चेला उधाणआयोगाने शासन अधिसुचना १३ आॅगस्ट २०१८ चा संदर्भ देऊन थेट जनतेमधून सरपंच निवडल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मंगळवारी विधानसभेत ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडीचा प्रस्ताव पारीत केला असल्याने पुन्हा सदस्यांमधून सरपंच निवडले जाणार असल्याचे मेसेज दिवसभर व्हायरल झाल्याने संभ्रम होता. यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागासी संपर्क साधला असता, याविषयी कुठलेच आदेश नसल्याचे सांगण्यात आले.शिवरात शेतकरी व्यस्तगावागावातील निवडणुकीचा कार्यक्रम दीड महिना राहणार आहे. मात्र, याच काळात शिवारांमध्ये हरभऱ्याची सवंगणी व मळणीचा हंगाम राहणार असल्याने शेतकरी व्यस्त राहणार आहे. संपर्क साधताना उमेदवारांची कसरत होणार आहे.

टॅग्स :sarpanchसरपंच