शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

डीटीएड विद्यालयात ७० टक्के जागा रिक्त

By admin | Updated: October 6, 2015 00:26 IST

नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांचा कल आता अध्यापक विद्यालयाकडे (डीटीएड) राहिलेला नाही.

संख्या रोडावली : केवळ ३० टक्केच प्रवेशप्रदीप भाकरे अमरावतीनोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांचा कल आता अध्यापक विद्यालयाकडे (डीटीएड) राहिलेला नाही. त्यामुळे राज्यभरात या विद्यालयांना घरघर लागली आहे. जिल्ह्यातील २७ अध्यापक विद्यालयांतील ७० टक्के प्रवेश रिक्त असून गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील १० पेक्षा अधिक अध्यापक विद्यालये बंदे पडली आहेत.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत जिल्ह्यात २७ अध्यापक विद्यालये आहेत. या २७ अध्यापक विद्यालयांमधील एकूण प्रवेशक्षमता १३२७ असून त्यापैकी केवळ ४१९ म्हणजे ३० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तब्बल ७० टक्के प्रवेश रिक्त आहेत. यात मराठी, हिंदू व उर्दू माध्यमांच्या विद्यालयांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात (शहरासह) १२, तिवसा -२, वरुडमध्ये २, चांदूरबाजार २, चिखलदरा १, दर्यापूर ३, अचलपूर २, अंजनगाव सुर्जी १ तथा धामणगाव रेल्वे तालुक्यात २ अध्यापक विद्यालये आहेत. विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांनी विविध प्रलोभने दाखवून विद्यार्थी मिळविले आहेत. मात्र अनुदानित विद्यालयातील व्यवस्थापन विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यात अयशस्वी ठरले आहे. गेल्या चार वर्षात ११ अध्यापक विद्यालये बंद पडली असताना सध्या सुरु असलेल्या २७ पैकी ८/९ विद्यालये नजीकच्या कालावधीत बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. का लागली घरघर ?अनेक वर्षांपासून इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सरळ डीटीएड करण्यासाठी पुढाकार घेत असे. मात्र मागील काही वर्षांपासून शिक्षकांची भरती प्रक्रिया बंद झाल्याने व सीईटी परीक्षा घेण्यात न आल्याने डीटीएड विद्यार्थ्यांची हळूहळू बेकारी वाढत गेली. यासाठी शासनाने टीईटी आणि सीईटी या दोन परीक्षा बंधनकारक केल्याने डीटीएड झालेले विद्यार्थी टीईटी परीक्षेतूनच बाहेर निघत नसल्याने व सीईटी परीक्षा कधी घेतली जाणार याची तारीख निश्चित नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढली. नौकरीची हमी नसल्याने दोन वर्षे व्यर्थ का घालवायचे, अशी मानसिकता झाली व त्यातून दोन वर्षांपासून डीटीएडकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलला. चार वर्षांत १० विद्यालये बंदज्या अध्यापक विद्यालयांना विद्यार्थी मिळाले नाहीत, ज्यांना विद्यार्थ्यांची पळवापळवी जमली नाही, अशी जिल्ह्यातील १० अध्यापक विद्यालये मागील चार वर्षांत बंद पडलीत. २०११-१२ मध्ये जिल्ह्यात ३८ अध्यापक विद्यालये होती. २०१५-१६ च्या सत्रात २७ अध्यापक विद्यालये आहेत. सीईटी झाली नाही आणि टीईटीमध्ये विद्यार्थी टिकत नाही, अशा विपरीत परिस्थितीत डीटीएडला प्रवेशसंख्या रोडावली आहे. दोन वर्षांचा अभ्यासक्रम करूनही नोकरीची हमी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे.- मिलिंद कुबडे,प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती.