शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

डीटीएड विद्यालयात ७० टक्के जागा रिक्त

By admin | Updated: October 6, 2015 00:26 IST

नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांचा कल आता अध्यापक विद्यालयाकडे (डीटीएड) राहिलेला नाही.

संख्या रोडावली : केवळ ३० टक्केच प्रवेशप्रदीप भाकरे अमरावतीनोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांचा कल आता अध्यापक विद्यालयाकडे (डीटीएड) राहिलेला नाही. त्यामुळे राज्यभरात या विद्यालयांना घरघर लागली आहे. जिल्ह्यातील २७ अध्यापक विद्यालयांतील ७० टक्के प्रवेश रिक्त असून गेल्या चार वर्षांत जिल्ह्यातील १० पेक्षा अधिक अध्यापक विद्यालये बंदे पडली आहेत.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत जिल्ह्यात २७ अध्यापक विद्यालये आहेत. या २७ अध्यापक विद्यालयांमधील एकूण प्रवेशक्षमता १३२७ असून त्यापैकी केवळ ४१९ म्हणजे ३० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तब्बल ७० टक्के प्रवेश रिक्त आहेत. यात मराठी, हिंदू व उर्दू माध्यमांच्या विद्यालयांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अमरावती तालुक्यात (शहरासह) १२, तिवसा -२, वरुडमध्ये २, चांदूरबाजार २, चिखलदरा १, दर्यापूर ३, अचलपूर २, अंजनगाव सुर्जी १ तथा धामणगाव रेल्वे तालुक्यात २ अध्यापक विद्यालये आहेत. विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांनी विविध प्रलोभने दाखवून विद्यार्थी मिळविले आहेत. मात्र अनुदानित विद्यालयातील व्यवस्थापन विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यात अयशस्वी ठरले आहे. गेल्या चार वर्षात ११ अध्यापक विद्यालये बंद पडली असताना सध्या सुरु असलेल्या २७ पैकी ८/९ विद्यालये नजीकच्या कालावधीत बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. का लागली घरघर ?अनेक वर्षांपासून इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सरळ डीटीएड करण्यासाठी पुढाकार घेत असे. मात्र मागील काही वर्षांपासून शिक्षकांची भरती प्रक्रिया बंद झाल्याने व सीईटी परीक्षा घेण्यात न आल्याने डीटीएड विद्यार्थ्यांची हळूहळू बेकारी वाढत गेली. यासाठी शासनाने टीईटी आणि सीईटी या दोन परीक्षा बंधनकारक केल्याने डीटीएड झालेले विद्यार्थी टीईटी परीक्षेतूनच बाहेर निघत नसल्याने व सीईटी परीक्षा कधी घेतली जाणार याची तारीख निश्चित नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढली. नौकरीची हमी नसल्याने दोन वर्षे व्यर्थ का घालवायचे, अशी मानसिकता झाली व त्यातून दोन वर्षांपासून डीटीएडकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलला. चार वर्षांत १० विद्यालये बंदज्या अध्यापक विद्यालयांना विद्यार्थी मिळाले नाहीत, ज्यांना विद्यार्थ्यांची पळवापळवी जमली नाही, अशी जिल्ह्यातील १० अध्यापक विद्यालये मागील चार वर्षांत बंद पडलीत. २०११-१२ मध्ये जिल्ह्यात ३८ अध्यापक विद्यालये होती. २०१५-१६ च्या सत्रात २७ अध्यापक विद्यालये आहेत. सीईटी झाली नाही आणि टीईटीमध्ये विद्यार्थी टिकत नाही, अशा विपरीत परिस्थितीत डीटीएडला प्रवेशसंख्या रोडावली आहे. दोन वर्षांचा अभ्यासक्रम करूनही नोकरीची हमी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे.- मिलिंद कुबडे,प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती.