शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे ६८ कोटी शासनाकडे पडून

By admin | Updated: May 13, 2015 00:35 IST

अमरावती विभागातील दोन लाख शेतकऱ्यांवर दुष्काळी मदत निधीची रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही.

सुमित हरकुट चांदूरबाजारअमरावती विभागातील दोन लाख शेतकऱ्यांवर दुष्काळी मदत निधीची रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईत मार्च एंडींगच्या नादात प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी वाटप करणे आवश्यक होते. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी या निधीचे वाटप देय मुदतीत न झाल्यामुळे दुष्काळग्रस्त मदतीचे ६८ कोटी रूपये शासनाकडे परत गेलेत. अद्यापही ही रक्कम शासनाकडे पडून आहे. या परत गेलेल्या निधीपैकी अंदाजे ४८ कोटी रूपयांची मागणी विभागीय प्रशासनाने सरकारकडे केली असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येते.दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतनिधीपैकी विभागातील १ लाख ८९ हजार ४३० शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहेत. विभागातील संपूर्ण प्रशासन मार्च एंडींगच्या प्रक्रियेत गुंतल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचू शकत नाही. मार्च महिन्याचा ताळेबंदची प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांना तातडीने युद्धस्तरावरुन या निधीचे वाटप करण्यात येईल, असे मार्चमध्येच संबंधित प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु चालू वर्षी खरीप हंगाम तोंडावर आला असतानासुद्धा विभागातील दोन लाख शेतकरी दुष्काळग्रस्त मदतनिधीपासून वंचित आहेत. याचा सर्वाधिक फटका बुलडाणा जिल्ह्याला बसला.राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे व दुष्काळाने पिळलेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे सर्व राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी, सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी राजकारण करताना दिसतात. परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांचा जीव जातो याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ मिळत नाही. यावरून ही मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किती जागृत आहे, हे दिसून येते. येत्या खरीप पेरणीकरिता शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करणे कठीण जात आहे.