शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे ६८ कोटी शासनाकडे पडून

By admin | Updated: May 13, 2015 00:35 IST

अमरावती विभागातील दोन लाख शेतकऱ्यांवर दुष्काळी मदत निधीची रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही.

सुमित हरकुट चांदूरबाजारअमरावती विभागातील दोन लाख शेतकऱ्यांवर दुष्काळी मदत निधीची रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईत मार्च एंडींगच्या नादात प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी वाटप करणे आवश्यक होते. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी या निधीचे वाटप देय मुदतीत न झाल्यामुळे दुष्काळग्रस्त मदतीचे ६८ कोटी रूपये शासनाकडे परत गेलेत. अद्यापही ही रक्कम शासनाकडे पडून आहे. या परत गेलेल्या निधीपैकी अंदाजे ४८ कोटी रूपयांची मागणी विभागीय प्रशासनाने सरकारकडे केली असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येते.दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतनिधीपैकी विभागातील १ लाख ८९ हजार ४३० शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहेत. विभागातील संपूर्ण प्रशासन मार्च एंडींगच्या प्रक्रियेत गुंतल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचू शकत नाही. मार्च महिन्याचा ताळेबंदची प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांना तातडीने युद्धस्तरावरुन या निधीचे वाटप करण्यात येईल, असे मार्चमध्येच संबंधित प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु चालू वर्षी खरीप हंगाम तोंडावर आला असतानासुद्धा विभागातील दोन लाख शेतकरी दुष्काळग्रस्त मदतनिधीपासून वंचित आहेत. याचा सर्वाधिक फटका बुलडाणा जिल्ह्याला बसला.राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे व दुष्काळाने पिळलेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे सर्व राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी, सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी राजकारण करताना दिसतात. परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांचा जीव जातो याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ मिळत नाही. यावरून ही मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किती जागृत आहे, हे दिसून येते. येत्या खरीप पेरणीकरिता शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करणे कठीण जात आहे.