शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

कर्जमाफीचे ६७५ प्रस्ताव

By admin | Updated: June 18, 2015 00:10 IST

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज संबंधित सावकारास अदा ...

सावकारी कर्जात आठ तालुके निरंक : समितीच्या पडताळणीनंतर ठरणार लाभार्थीगजानन मोहोड अमरावतीविदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज संबंधित सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय शासनाने १० एप्रिल २०१५ रोजी घेतला. याबाबत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तिथी ३० जून असताना जिल्ह्यातील आठ तालुके अद्यापही निरंक आहेत. उर्वरित तालुक्यांमधून २१ कोटी ५३ लाख २९ हजार रुपयांच्या कर्जासाठी ६७५ प्रस्ताव तालुकास्तरावर प्राप्त झाले आहेत. तालुका व जिल्हास्तरीय समितीच्या पडताळणीनंतर लाभार्थी संख्या निश्चित होईल. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले १५६ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज व शासनाद्वारे निर्धारित दरानुसार अंदाजे १५ कोटी १९ लाख रुपये व्याज असे १७१ कोटी ३० लाख रूपयांचे कर्ज शासकीय तिजोरीतून संबंधित सावकारांना अदा करण्याला शासनाला मान्यता दिली आहे. कर्जदार व्यक्ती सातबाराधारक शेतकरी असावा. शेतकऱ्याने स्वत: कर्ज न घेता त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने सावकाराकडून कर्ज घेतले असल्यास असे कर्ज या योजनेत पात्र आहे. मात्र सावकार हा महाराष्ट्र सावकारी(नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार परवानाधारक असणे आवश्यक आहे. या पध्दतीने सावकारी कर्जमुक्ती होऊ शकते. प्रस्ताव सादर करण्याची पध्दतसावकाराने शेतकऱ्याला दिलेल्या कर्जाच्या व व्याजाच्या तपशीलासह विहित नमुन्यात तालुक्याच्या सहा. निबंधकाकडे प्रस्ताव सादर करावा.प्रस्तावातील व्यक्ती शेतकरी असल्याचे सहा.निबंधकांनी आठ दिवसांच्या आत प्रमाणित करुन द्यावे. सातबाराधारक शेतकऱ्याने स्वत: कर्ज न घेता कुटूंबातील अन्य सदस्याने सावकाराकडून कर्ज घेतल्यास शिधापत्रिकेची प्रत जोडावी.तालुका समितीने प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांवर सात दिवसांत निर्णय घ्यावा. ३६ प्रकरणे उच्च न्यायालयातराज्य शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे परवानाधारक सावकारांकडे असणारे कर्ज व व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातील त्रुटी शोधून निर्णयाला आव्हान देत ३७ प्रकरणे नागपूर येथील उच्च न्यायालयात दाखल आहेत. सावकाराला द्यावे लागणार हमीपत्रशेतकऱ्यांंना दिलेल्या कर्जाची शासनाकडून व्याजासह सावकाराला परतफेड करताना शेतकऱ्यांकडून कर्जाचे कोणतेच येणे बाकी नसल्याचे हमीपत्र संबंधित सावकाराला सहा.निबंधकाला द्यावे लागणार आहे. यानंतर शेतकऱ्यांस कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.