शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

६७ उमेदवार ‘आऊट’

By admin | Updated: October 1, 2014 23:15 IST

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता जिल्ह्यात १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.

विधानसभा निवडणूक : आठ जागांसाठी १३५ उमेदवार कायमअमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता जिल्ह्यात १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.मेळघाट मतदारसंघात दोन उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दिवशी माघार घेतली आहे. यात भारिप-बमसंचे बन्सी बुध्दू मावसकर व अपक्ष लक्ष्मण ओंकार धांडे या दोघांचा समावेश आहे. आता या मतदारसंघात सहा उमेदवार कायम आहेत.मोर्शी मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात रोशनी दिलीप क्षीरसागर, संदीप अशोकराव रोडे, अशोकराव हरिभाऊ रोडे व श्याम लक्ष्मणराव बेलसरे यांचा समावेश आहे. मोर्शी मतदारसंघात आता १९ उमेदवार कायम आहेत.दर्यापूर मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ उमेदवारांनी माघार घेतली. आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. बुधवारी उमेदवारी मागे घेणाऱ्यांमध्ये श्रीराम नेहर, भूषण खंडारे, अविनाश गायगोले, संतोष कोल्हे, बबन विल्हेकर, पीरिपाचे भाऊ रायबोले, विनीत डोंगरदिवे, क्षितिज अभ्यंकर, प्रभाकर भोकरे यांचा समावेश आहे.धामणगाव रेल्वे मतदारसंघातून बुधवारी ११ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यात अनिल आठवले, योगेश कावळे, बंडू आंबटकर, नीलम रंगारकर, राजेश पाठक, जयकिसन मते, अनिल वरघट, संजय पुनसे, दिनेश अंभोरे, मेहमुद हुसेन, मधुकर सोनारे यांचा समावेश आहे. आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.अचलपूर मतदारसंघात बुधवारी सात जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. यात रमेश राईकवार, नामदेव झोड, नंदकिशोर वासनकर, ज्ञानेश्वर गादे, प्रभुदास मोहोड, नंदकुमार मडघे, तुळशीराम धुर्वे यांचा समावेश आहे. आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.अमरावती मतदारसंघात बुधवारी १२ उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. यात समीर देशमुख, सुधीर तायडे, सलीम बेग, मोहन साहू, किशोर हरमकर, शेख सुलतान शेख फकिरा, शेख अय्युब शेख घुडू, महेश तायडे, ज्योती काकणे, सपना ठाकूर, हरिदास शिरसाट व नरेंद्र हरणे यांचा समावेश आहे. आता या मतदारसंघात २० उमेदवार कायम आहेत.तिवसा मतदारसंघात १२ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात गजानन बोंडे, चंद्रशेखर कुरळकर, देवीदास निकाळजे, पवन देशमुख, भारत तसरे, संतोष महात्मे, अब्दुल अजीज पटेल, नाना मालधुरे, मिलिंद तायडे, रवींद्र खंडारे, संजय देशमुख, संजय कोल्हे यांचा समावेश आहे. येथे १८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.बडनेरा मतदारसंघात शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी माघार घेतली. यात अतुल झंझाळ, नितीन मोहोड, अब्दुल मजीद शेख महेमुद, हिंमत ढोले, विनोद सत्रावळे, रमेश आठवले, प्रवीण डांगे, कृष्णा गणवीर, सुनील गजभिये, अनिल वर्धे यांचा समावेश आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.