शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पांढुर्णा गोटमार यात्रेत ६४२ जखमी

By admin | Updated: September 6, 2016 00:16 IST

मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रात गोटमार यात्रा भरते.

पोळ्याच्या करीची परंपरा : १२ वर्षांत ७० जणांनी गमावले प्राण संजय खासबागे वरूडमध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रात गोटमार यात्रा भरते. पांढुर्णा आणि सावरगावचे नागरिक प्रेम कहाणीच्या दंतकथेच्या आधारे ही पारंपरिक गोटमार करतात. मध्यप्रदेश प्रशासनाने गोटमार यात्रा बंद करण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरलेत. यावर्षी पोळ्याच्या करीला गोटमार यात्रेला सकाळपासूनच प्रारंभ झाला. यामध्ये ६४२ नागरिक जखमी तर दोन गंभीर झालेत. त्यांना नागपूरला हलविण्यात आले. मागील ७० वर्षांत या यात्रेत १२ लोकांनी प्राण गमावले आहेत. तरीही ही कुप्रथा सुरूच आहे. वरुडपासून मध्यप्रदेशातील ३५ कि.मी. अंतरावरील पांढूर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रात गोटमार यात्रा भरते. ही यात्रा ३०० वर्षांपूर्वीच्या आख्यायिकेवर आधारित आहे. मात्र आजही ही परंपरा जोपासली जाते. सावरगाव आणि पांढुर्णा येथील प्रेमीयुगुलाच्या विवाहसंबंधाची ही दंतकथा आहे. पांढुर्ण्यातील युवक सावरगावच्या तरूणीला विवाह करण्याकरिता पांढुर्ण्याला नेत असताना दोन्ही गावातील लोकांमध्ये झालेल्या विरोधात नवदाम्पत्याचा जांब नदीतच मृत्यू झाला. अखेर दोघांनाही चंडीमातेच्या मंदिरात समाधी देण्यात आली. तेव्हापासून येथे यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून ही यात्रा भरते. यात्रेला सुरूवात होण्यापूर्वी भाविक सूर्योदयापूर्वी जांब नदीच्या पात्रात पळसाचे भले मोठे वृक्ष लावून त्यावर झेंडा लावतात. माध्यान्हानंतर या यात्रेला चांगली रंगत चढते. विदर्भासह मध्यप्रदेशातील काना कोपऱ्यातून गोटमार यात्रा पाहण्यास भाविकांची गर्दी होेते. अखेर दोन्ही गावातील नागरिकांच्या तडजोडीने सूर्यास्तानंतर झेंडा चंडीदेवीच्या मंदिरात आणून विधीवत पूजा केली जाते. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या अघोरी प्रथेमध्ये दरवर्षी शेकडो नागरिक नाहक जखमी होतात. अनेकांना अपंगत्व येते, तर शेकडो प्राणसुद्धा गमवावे लागले. तरीदेखील ही कुप्रथा आजतागायत सुरूच आहे. ही अघोरी यात्रा बंद करण्याकरिता प्रशासनाने अनेक वेळा दोन्ही गावांतील नागरिकांची समजूत काढली. तसेच चार वर्षांपूर्वी गोट्यांऐवजी रबरी बॉलसुद्धा दिले तरीसुध्दा प्रशासनाला न जुमानता गोटमार यात्रा अव्याहतपणे सुरूच आहे. गोटमारीकरिता दगडांचा खच लावला जातो. येथे दगड आणण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने भाविक आणि पोलिसांत तणाव झाला होता. प्रशासनाच्यावतीने जखमींवर उपचाराकरिता येथे कॅम्प लावण्यात येतो. तर शेकडो रूग्णवाहिकांचा ताफा तैनात असतो. हजारो पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित असतात. ही प्राचीन गोटमार यात्रा पाहण्याकरिता विदर्भासह मध्यप्रदेशातील खेड्यापाड्यांतून हजारो भाविकांची येथे गर्दी राहते. यावर्षी गोटमार यात्रेमध्ये दगडफेकीच्या धुमश्चक्रीत ६४२ भाविक जखमी झालेत, तर रमेश वघाळे (रा.पांढुर्णा) आणि विठ्ठल अजमिरे (सावरगाव) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ !प्रशासनाने अनेकवेळा ही प्रथा बंद करण्याकरिता दोन्ही गावांतील नागरिकांची समजूत काढली. चार वर्षांपूर्वी गोट्यांऐवजी रबरी बॉलसुद्धा दिले. मात्र प्रशासनाला न जुमानता ही गोटमार यात्रा अव्याहतपणे सुरुच आहे. गोटमारीकरिता दगडांचा खच लावला जातो. ७० वर्षांत १२ जणांचा मृत्यू येथील गोटामार यात्रेमध्ये गोटमारीत ७० वर्षांच्या काळखंडात १२ निष्पाप लोकांचे प्राण गेले. यामध्ये सन १९५५ मध्ये स्व.महोदव सांबारे, १९७८ मध्ये स्व. देवराव सकर्डे, १९७९ मध्ये स्व.लक्ष्मण तायवाडे, १९८७ मध्ये स्व. कोठीराम सांबारे, १९८९ मध्ये स्व. विठ्ठल तायवाडे, स्व.योगिराज चवरे, स्व.गोपाल चन्ने, स्व. सुधाकर हापसे, २००४ मध्ये रवि गायकी, २००५ मध्ये जनार्दन सांबारे, २००८ मध्ये गजानन घुग्गुसकर, २०११ मध्ये स्व. देवानंद वघाळे यांचा समावेश आहे.