शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

६,३१९ कृषीपंपांना जोडणी नाही

By admin | Updated: April 20, 2017 00:12 IST

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचवावा, सिंचनाच्यासुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी शासनाद्वारा विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना विहीर मंजूर केल्या जातात.

पैसे भरुनही प्रतीक्षा कायम : शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्याची शोकांतिकाअमरावती : शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचवावा, सिंचनाच्यासुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी शासनाद्वारा विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना विहीर मंजूर केल्या जातात. यावर करोडोंचा खर्च होतो, मात्र या विहिरींना कृषी वीज पंपांची जोडणी व्हावी, यसाठी पैसे भरूनही जोडण्या झाल्या नसल्याची धक्कादायक बाब आहे. शेतकरी आत्महत्याप्रवण असलेल्या जिल्ह्यात मार्च २०१७ अखेरपर्यंत सहा हजार ३१९ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांचे अर्ज प्रलंबित असल्याची जिल्ह्याची शोकांतिका आहे.जिल्ह्यात सिंचनाचा टक्का वाढावा याद्वारे शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न व्हावे, शेतकरी आर्थिक संपन्न होऊन शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हा हा डाग पुसल्या जावा, यासाठी शासनाद्वारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धडक सिंचन विहिरींसह अनेक योजना राबविते. बँकांद्वारा विहीर खोदण्यासाठी कर्जाच्या विविध आहेत. या सर्वांच्या आधरे शेतकरी विहीर खोदतात. मात्र, या विहिरींना जर कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळालीच नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र, वीज कंपनीद्वारा शासनाने प्राधान्य दिलेल्या विषयाला साफ धुडकावून लावण्याचे चित्र आहे. मात्र २०१६ अखेर पैसे भरून अर्ज प्रलंबित असणारे सहा हजार १७ शेतकरी होते. त्यापैकी पाच हजार २६० शेतकऱ्यांना मार्च २०१७ अखेर वीज जोडण्या दिल्या आहेत. वर्षभर दाखल झालेले अर्ज व वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करणारे सहा हजार ३१९ शेतकऱ्यांना मार्च २०१७ अखेर पावेतो विज जोडणी मिळाली नाही. जोडणी मिळेल या आशेवर त्यांनी नियोजन केलेले उन्हाळी पिकांचे व येत्या खरीप हंगामाचे स्वप्न धुसर झाले आहे.