शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

पेरणीपूर्व मिळणार बोंडअळी नुकसानीचे ६१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:15 IST

गतवर्षीच्या खरिपात बोंड अळीच्या संकटाने एक लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यास तीन हप्त्यांमध्ये मदत : ‘एनडीआरएफ’ च्या १८२.६० कोटीस शासन मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या खरिपात बोंड अळीच्या संकटाने एक लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे. या निधीला शासनाने ८ मे रोजी मंजुरी दिली. मात्र, हा निधी जिल्ह्यास समान तीन हप्त्यामध्ये मिळणार असला तरी शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार आहे. पहिल्या हप्यात ६०.८६ कोटींचा निधी मिळणार असल्याने यंदाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत होईल.जिल्ह्यात २,२१,४१५ शेतकऱ्यांच्या २,२२,५८६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १ लाख ९९,१७२ हेक्टरमधील कपाशी बाधित झाल्याचे निदर्शनास आले. या क्षेत्रासाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १८२.६० कोटी तीन हजार ४९३ रूपयांची मागणी शासनाकडे केली. बाधित कपाशीसाठी हेक्टरी ३०,८०० रूपयांची मदत देण्याची घोषणा कृषिमंत्र्यांनी २३ डिसेंबरला नागपूर विधिमंडळात केली. प्रत्यक्षात फक्त ‘एनडीआरएफ’ची हेक्टरी ८,५०० रूपयांप्रमाणे ही मदत मिळणार आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांकडून हेक्टरी १६ हजार रूपये व विम्याचे हेक्टरी आठ हजार रूपये, अशी मदत देणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, कपाशीच्या विम्यात अर्धे अधिक शेतकºयांना डावलले, तर बियाणे कंपन्यांकडून मदतीचा खुद्द कृषिमंत्र्यांनाच विसर पडला आहे. ‘एनडीआरएफ’चीे मदतदेखील तीन समान हप्त्यात देण्यात येणार आहे.मदतनिधीतून कर्जकपात नाहीमदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या निधीमधून कर्जकपात करता येणार नाही. मदतनिधीचे वाटप झाल्यानंतर लाभार्थींची यादी त्यांना वाटप निधीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. जिल्ह्यास हा निधी एकसमान तीन हप्त्यांत देण्यात येत असला तरी शेतकºयांना अनुज्ञेय रक्कम एकाचवेळी देण्यात येणार आहे.बँक खाते आधार संलग्न आवश्यकशेतकऱ्यांच्या आधार संलग्नीत खात्यांत ही रक्कम हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने प्रदान केली जाणार आहे. परंतु एखाद्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नसेल तर तो शेतकरी वंचित राहू नये, यासाठी निवडणूक ओळखपत्र, आधार नोंदणी पावती, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लॉयसन्स, पारपत्र किंवा बँकेची पुस्तिकेची खातरजमा करून प्रदान करण्यात यावी, असे ८ मेच्या शासनादेशात स्पष्ट केले आहे.