शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

६०५ कोटींचे कर्जवाटप रखडले

By admin | Updated: August 1, 2016 23:56 IST

जिल्हत यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकाना १७४९ कोटी ४६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचा लक्षांक असताना जुलै अखेर ११५५ कोटी ४० रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

शासनाला बँका जुमानेनात : २०,५२६ शेतकऱ्यांचे २५२ कोटींचे पुनर्गठन नाहीअमरावती : जिल्हत यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकाना १७४९ कोटी ४६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचा लक्षांक असताना जुलै अखेर ११५५ कोटी ४० रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. अद्याप २४ टक्के म्हणजेच ६०५ कोटी ६ लाख रुपयांचे कर्जवाटप रखडले आहे. ३१ जुलै ही पुनर्गठनची अंतिम तारीख असताना २० हजार ५२६ शेतकऱ्यांच्या २५२ कोटी ७३ लाख रुपयांचे कर्ज पुनर्गठन न झाल्याने ते कर्जापासून वंचित राहणार आहेत. सलग दुष्काळ, नापिकी, व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी यंदा प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला आहे. यंदाच्या खरीप हंगामात ८० टक्के पात्र शेतकऱ्यांना पीककर्जाचे प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. यामध्ये ग्रामीण बँकांनी ८८ टक्के, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी ६९ टक्के कर्जवाटप केले.परंतु शेतकऱ्यांची म्हणवविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र ५९ टक्केच कर्जवाटप केले आहे.मागीलवर्षीच्या कर्जवाटप लक्षाकांच्या तुलनेत यंदा शासनाने लक्षांकात ३१ टक्के वाढ केली आहे. जिल्हास्तरीय समन्वय समितीने एडीएलसीसीद्वारा हा लक्षांक निश्चित केला आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १७५९ कोटी ४६ लाख रुपयांचे खरीप पीककर्ज वाटपाचा लक्षांक दिला व ३१ जुलैच्या आत कर्जवाटपाची तंबी दिली. मात्र, मुदतीच्या आत जिल्हा बँकेने ५७१ कोटी ३३ कोटी रुपये इतके म्हणजे लक्षांकाच्या तुलनेत ४० हजार ३३७ शेतकऱ्यांना ३३६ कोटी २३ लाखाचे कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी ११७२ कोटी १३ लाख लक्षांकाच्या तुलनेत ८९६ कोटी २० लाख रुपयांचे कर्जवाटप केले तर ग्रामीण बँकांनी १६ कोटी लक्षाकांच्या तुलनेत १२ कोटी ९७ लाख रुपयांचे कर्जवाटप जुलैअखेर केले आहे. अधिकाधिक नवीन शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामासाठी कर्जवाटप करण्याचे शासनाचे निर्देश असताना जिल्हा बँकेने केवळ २०३ शेतकऱ्यांना ९६ लाखांचे कर्ज वाटप केले आहे.असे झाले बँकनिहाय कर्जवाटपअलाहाबाद बँकने २० कोटी ९८ लाख, आंध्रा बँक ५४ लाख, बँक आॅफ बडोदा ७ कोटी ५० लाख, बँक आॅफ इंडिया २१ कोटी १९ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र १८० कोटी ९७ लाख, कॅनरा बँक २ कोटी ४७ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया १७१ कोटी ८४ लाख, कॉर्पोरेशन बँक २ कोटी ४७ लाख, देना बँक ३३ कोटी ३७ लाख, आयडीबीआय बँक ८ कोटी २३ लाख, इंडियन बँक ७ कोटी १० लाख, ओव्हरसीज बँक ४ कोटी २२ लाख, पंजाब नॅशनल बँक २ कोटी ७० लाख, स्टेट बँक आॅफ हैद्राबाद १३ लाख, स्टेट बँक २.८२ कोटी ३८ लाख, सिंडीकेट बँक २४ लाख, युको बँक ३ कोटी ५० लाख, युनियन बँक ३२ लाख ५१ लाख व विजया बँकेने १२ लाख रूपयांचेकर्जवाटप केले आहे. (प्रतिनिधी)नाबार्डच्या ६० टक्के हिस्याला हवी शासन हमीराज्यातील ५० पैश्याच्या आत पैसेवारी असणारी १६ हजार ८०० गावे आहेत. यामध्ये ११ हजार ३५ शेतकरी पुनर्गठनास पात्र आहेत. साधारणपणे ४ हजार ४९२ कोटी कर्ज पुनर्गठनास पात्र आहे. यामध्ये २२५ कोटी असा १५ टक्के शासनाचा हिस्सा असला तरी कर्जपुनर्गठनासाठी ६० टक्के हिस्सा म्हणजे ९०० कोटी रुपयांच्या रक्कमेला शासनाची हमी आवश्यक आहे.पुनर्गठनाचे कर्जवाटपापूर्वी मुदत संपलीजिल्ह्यात यंदा ७० हजार ४९९ शेतकऱ्यांचे ६३३ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज पुनर्गठनास पात्र होते. यातुलनेत बँकांनी ६२ हजार ३९९ शेतकऱ्यांचे ५०५ कोटी ७३ लाखांचे कर्ज पुणर्गठन करण्यात आले. मात्र, ३१ जुलै या अंतिम मुदतीपुर्व ४२ हजार ४१९ शेतकऱ्यांना ३८७ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज पुनर्गइन केलेल्या शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले. अद्याप २० हजार ५२६ शेतकऱ्यांच्या २५२.७३ कोटींचे कर्ज पुनर्गठन रखडले आहे. पुनर्गठनाच्या कर्जवाटपाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याच्या पदरी निराशा आली आहे.