शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

आॅनलाईन नोंदणीचे ६० हजार शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:19 IST

जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १५ मेपासून तूर व २९ मेपासून हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या ६० हजार शेतकऱ्यांचा शेतमाल घरी पडून आहे. आठवड्यावर खरीप आल्याने हंगामाची तयारी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. शेवटच्या दाण्यापर्यत तूर व हरभऱ्याची खरेदी करण्याचे शासनाचे आश्वासन फोल ठरले आहे.

ठळक मुद्देमुदतवाढ केव्हा? : पाच लाख क्विंटल तूर, हरभरा घरी पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १५ मेपासून तूर व २९ मेपासून हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या ६० हजार शेतकऱ्यांचा शेतमाल घरी पडून आहे. आठवड्यावर खरीप आल्याने हंगामाची तयारी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. शेवटच्या दाण्यापर्यत तूर व हरभऱ्याची खरेदी करण्याचे शासनाचे आश्वासन फोल ठरले आहे.केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीच्या धोरणानुसार जिल्ह्यात १५ ते २४ मार्च या कालावधीत हरभरा खरेदीसाठी १२ केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांवर २९ मेपर्यंत ३३,५५५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्या तुलनेत मुदतीपर्यंत १०,८०० शेतकऱ्यांची १ लाख ७६ हजार ६८३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या २२,९५५ शेतकऱ्यांचा किमान दोन लाख क्विंटल हरभरा घरी पडून आहे.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १२ तूर खरेदी केंद्रांवर बुधवार १८ एप्रिलपर्यतच आॅनलाईन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश होते. त्यानंतर आठ दिवसांनी केंद्रांना १५ मुदतवाढ दिली असली तरी खरेदीदार यंत्रणांनी निव्वळ टाईमपास केला.१५ मे रोजी शासनाने तूर खरेदी बंद केली. त्यामुळे सद्यस्थितीत ७०,१९७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी, प्रत्यक्षात ३२,७५५ शेतकऱ्यांची ५.२१ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ३७ हजार ४२२ टोकनधारक शेतकऱ्यांची किमान तीन लाख क्विंटल तूर अजुनही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.केंद्रांना मुदतवाढ, चुकाऱ्याचे आश्वासन फोलजिल्ह्यात साधारणपणे आॅनलाइन नोंदणी केलेल्या ६० हजारांवर शेतकऱ्यांची तूर व हरभरा शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खासगी बाजारात हमीपेक्षा कमी भावाने मागणी होत असल्याने त्यांची लूट निश्चित आहे. ते सतत आंदोलने करीत असल्यामुळे शासनाने केंद्रांना मुदतवाढीचे आश्वासन दिले. मात्र, त्यालाही दोन आठवड्यांचा कालावधी झाला असताना मुदतवाढ नाही व मागील दोन महिन्यांपासूनचे चुकारेदेखील शासनाने दिलेले नाहीत.