शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

आॅनलाईन नोंदणीचे ६० हजार शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:19 IST

जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १५ मेपासून तूर व २९ मेपासून हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या ६० हजार शेतकऱ्यांचा शेतमाल घरी पडून आहे. आठवड्यावर खरीप आल्याने हंगामाची तयारी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. शेवटच्या दाण्यापर्यत तूर व हरभऱ्याची खरेदी करण्याचे शासनाचे आश्वासन फोल ठरले आहे.

ठळक मुद्देमुदतवाढ केव्हा? : पाच लाख क्विंटल तूर, हरभरा घरी पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १५ मेपासून तूर व २९ मेपासून हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या ६० हजार शेतकऱ्यांचा शेतमाल घरी पडून आहे. आठवड्यावर खरीप आल्याने हंगामाची तयारी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. शेवटच्या दाण्यापर्यत तूर व हरभऱ्याची खरेदी करण्याचे शासनाचे आश्वासन फोल ठरले आहे.केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीच्या धोरणानुसार जिल्ह्यात १५ ते २४ मार्च या कालावधीत हरभरा खरेदीसाठी १२ केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांवर २९ मेपर्यंत ३३,५५५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्या तुलनेत मुदतीपर्यंत १०,८०० शेतकऱ्यांची १ लाख ७६ हजार ६८३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या २२,९५५ शेतकऱ्यांचा किमान दोन लाख क्विंटल हरभरा घरी पडून आहे.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १२ तूर खरेदी केंद्रांवर बुधवार १८ एप्रिलपर्यतच आॅनलाईन नोंदणीचे पणन विभागाचे आदेश होते. त्यानंतर आठ दिवसांनी केंद्रांना १५ मुदतवाढ दिली असली तरी खरेदीदार यंत्रणांनी निव्वळ टाईमपास केला.१५ मे रोजी शासनाने तूर खरेदी बंद केली. त्यामुळे सद्यस्थितीत ७०,१९७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी, प्रत्यक्षात ३२,७५५ शेतकऱ्यांची ५.२१ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ३७ हजार ४२२ टोकनधारक शेतकऱ्यांची किमान तीन लाख क्विंटल तूर अजुनही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.केंद्रांना मुदतवाढ, चुकाऱ्याचे आश्वासन फोलजिल्ह्यात साधारणपणे आॅनलाइन नोंदणी केलेल्या ६० हजारांवर शेतकऱ्यांची तूर व हरभरा शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खासगी बाजारात हमीपेक्षा कमी भावाने मागणी होत असल्याने त्यांची लूट निश्चित आहे. ते सतत आंदोलने करीत असल्यामुळे शासनाने केंद्रांना मुदतवाढीचे आश्वासन दिले. मात्र, त्यालाही दोन आठवड्यांचा कालावधी झाला असताना मुदतवाढ नाही व मागील दोन महिन्यांपासूनचे चुकारेदेखील शासनाने दिलेले नाहीत.