शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अपघात विम्याचे ५८ लाख

By admin | Updated: December 12, 2015 00:22 IST

कृषी विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता विमा योजनेत ४ डिसेंबरपर्यंत ६० प्रकरणंत दोन प्रस्ताव विमा कंपनीद्वारा नाकारण्यात आले होते.

कृषी विभागाने राबविली योजना : २६ प्रस्ताव मंजूर, २२ प्रलंबित अमरावती : कृषी विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता विमा योजनेत ४ डिसेंबरपर्यंत ६० प्रकरणंत दोन प्रस्ताव विमा कंपनीद्वारा नाकारण्यात आले होते. पैकी २६ प्रस्ताव मंजूर असून २० प्रकरणे कंपनीकडे प्रलंबित आहे. अशा ५८ प्रकरणात शेतकऱ्यांना अपघात विम्यापोटी ५८ लाख मिळणार आहे. कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्यावतीने शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात या योजनेअंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचा अपघात मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळेनिकामी झाल्यास किंवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची विमा भरपाई कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळते. अमरावती विभागात अमरावती, मोर्शी व अचलपूर असे तीन उपविभाग आहेत. अमरावती विभागात ४ डिसेंबर पर्यंत ३० प्रकरणे दाखल करण्यात आली. या पैकी ११ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आले. ५ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आहे तर १४ प्रस्ताव त्रुटी अभावी प्रलंबित आहे. मोर्शी उपविभागात २३ प्रकरणे दाखल करण्यात आली. यापैकी १२ प्रस्ताव कंपनीकडू मंजूर करण्यात आलीत. अद्याप १० प्रकरणे त्रुटी अभावी प्रलंबित आहे. अचलपूर उपविभागात अपघात विम्याची ७ प्रकरणे दाखल करण्यात आलीत या पैकी ३ प्रस्ताव विमा कंपनीद्वारा मंजूर करण्यात आले आहे. १ प्रस्ताव नामंजूर व ३ प्रस्ताव चौकसीसाठी प्रलंबित आहेत. शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही अटी शिथिल कराव्या, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)अशी आहे शेतकरी जनता विमा योजना शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात/ बीज पडणे/ शॉक लागणे, पूर , सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू होतो. अनेकदा कायमस्वरुपी अपंगत्व येते. या परिवाराला उदरनिर्वाहासाठी आर्थिक लाभ मिळावा यासाठी आॅगस्ट २०१४ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. याच योजनेला २००९-१० मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजना, असे नाव देण्यात आले आहे.