शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

५७ टक्केच शाळा प्रगत !

By admin | Updated: April 10, 2017 00:12 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळा डिजिटल करून तेथे ‘ई-लर्निंग’ वर भर देण्यात येत असून

कासवगती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाला बाधाअमरावती : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळा डिजिटल करून तेथे ‘ई-लर्निंग’ वर भर देण्यात येत असून या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमामुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शाळांचा गुणवत्तेचा स्तर उंचावत असला तरी जिल्ह्यात मात्र शाळांच्या प्रगतीची गती मंदावल्याचे आकडेवारीवरू न दिसृून येते. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५७ टक्केच शाळा शंभर टक्के प्रगत झाल्याचे दिसते. शासनाने २२ जून २०१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. याउपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त करणे, त्याच्या शैक्षणिक प्रगतीचे चाचणीच्या माध्यमातून मूल्यमापन करणे, भाषा व गणित विषयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, ज्ञानरचनवाद शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केले जातात. शाळा डिजिटल करून चार विद्यार्थ्यांमागे एक ‘टॅबलेट’ देऊन त्यांना स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील ७० ते ८० टक्के शाळा प्रगत आहेत. यातुलनेत जिल्ह्यातील शाळांच्या प्रगतीची गती अतिशय मंद आहे. ‘शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमा’स शहरातील शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात अगदी Þउलट परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या प्रगतीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्याचा निष्कर्ष प्राप्त आकडेवारीवरून काढला जाऊ शकतो. जिल्ह्यातील १,६०१ प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांपैकी अर्ध्या शाळासुद्धा प्रगत झाल्या नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५७ टक्के शाळाच प्रगत झाल्या आहेत. या उपक्रमाला शिक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्राथमिक शाळांच्या प्रगतीचा टक्का घसरला आहे. याकारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येणाऱ्या अडचणी आणि शिक्षकांपुढे उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.तालुकानिहाय प्रगत शाळाअमरावती ६३, भातकुली ७८, अचलपूर १०३, नांदगाव खंडेश्र्वर ९०, अंजनगाव सुर्जी ३८, दर्यापूर ५७, चांदूरबाजार ५६, वरूड ६८, मोर्शी ४२, चांदूररेल्वे ६७, धामणगांव रेल्वे ६६, तिवसा ५८, धारणी ५५, चिखलदरा ६२, प्राथमिक शाळा ६१४ आणि उच्च प्राथमिक अशा २९० शाळा प्रगत झाल्या आहेत. जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ६०१ शाळांपैकी ९०४ शाळांची प्रगती झाल्याचे शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.जिल्ह्यातील शाळांची प्रगती संथगतीने होत आहे, असे म्हणता येणार नाही. ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे. शाळांच्या प्रगतीची गती कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.- एस.एम.पानझाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक