शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

५४ अल्पवयीन मुलं-मुली अपहरणानंतर बेपत्ताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:17 IST

जिल्ह्यातील ५४ अल्पवयीन मुले-मुली अपहरणानंतर बेपत्ताच असल्यामुळे त्यांचा आॅपरेशन मुस्कानद्वारे पोलीस विभागाने शोध चालविला आहे. शहर व ग्रामीण अशा एकूण ४१ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटना असून, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या बेपत्ता, हरविलेल्या व अपहृत मुला-मुलींचा कसून शोध घेत आहेत.

ठळक मुद्देआॅपरेशन मुस्कान मोहीम प्रारंभ : ग्रामीण हद्दीत गुन्हे शाखेची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ५४ अल्पवयीन मुले-मुली अपहरणानंतर बेपत्ताच असल्यामुळे त्यांचा आॅपरेशन मुस्कानद्वारे पोलीस विभागाने शोध चालविला आहे. शहर व ग्रामीण अशा एकूण ४१ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटना असून, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या बेपत्ता, हरविलेल्या व अपहृत मुला-मुलींचा कसून शोध घेत आहेत.१८ वर्षांखालील बेपत्ता व अपहृत बालकांचा शोध घेऊन, त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी शासनाने आॅपरेशन मुस्कॉन ही मोहीम सुरू केली. या मोहिमेसाठी प्रत्येक ठाण्यातील एक पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस विभागाकडून १ ते ३१ डिसेंबरपर्यंत आॅपरेशन मुस्कॉन अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा, तर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून महिलासह सर्व ठाण्याच्या हद्दीत ही मोहीम राबविली जात आहे. ग्रामीण हद्दीतील ३१ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २०१६ मध्ये १५७ अपहरणाचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. २०१७ मध्ये १३४, तर नोव्हेंबर २०१८ पर्यंत १४२ अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी ३६ मुली व ५ मुली अद्यापही बेपत्ता आहेत. त्याप्रमाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १० पोलीस ठाण्यांतर्गत नोव्हेंबर २०१८ पर्यंत ९५ अपहरणाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सन २०१७ ते २०१८ दरम्यान दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यापैकी १८ मुली व ५ मुले अद्यापही मिळून आलेले नाहीत. या सर्व मुला-मुलींचा शोध आॅपरेशन मुस्कॉन मोहिमेद्वारा घेतला जात आहे.प्रेमप्रकरणातून सर्वाधिक अपहरणाचे गुन्हेआजच्या आधुनिक काळातील १८ वर्षांखालील अल्पवयीन मुला-मुलींमध्ये प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढत असून, प्रेमप्रकरणातून अनेक मुले-मुली पळून गेल्याचेही निदर्शनास आले आहेत. नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्हाभरात २३७ अपहरणाचे गुन्हे नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये सर्वाधिक प्रकरणे प्रेमप्रकरणाची आहेत. यापैकी बहुतांश गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावलेला आहे.पोलीस असा घेणार शोधपोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रेल्वेस्थानके, रुग्णालये, उद्याने, व्यापारी संकुल, कारखाने व सार्वजनिक ठिकाणी फिरणारे, भीक मागणाºया मुला-मुलींशी संपर्क साधून, त्यांची चौकशी करणार आहेत. त्यानंतर संबंधित बालकांचा रेकॉर्ड तपासून, त्या बालकांना आई-वडिलांपर्यंत पोहोचवून दिले जाणार आहे.का केले जाते अपहरण?१८ वर्षांखालील बालक बेपत्ता, हरविला किंवा अपहरण झाल्यास पोलीस भादंविच्या कलम ३६३ (अपहरण) चा गुन्हा नोंदवितात. यामध्ये प्रेमप्रकरणाचे प्रमाण सर्वाधिक आढळून आलेत. मात्र, ज्या बालकांचा शोध लागला नाही, त्याच्याशी अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते. लहान बालकांचे अपहरण करून दुसºया शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून, त्यांच्याकडून भीक मागविली जाते. काही मुलींना देहविक्रीच्या कामी लावले जाते, काहींना गुन्हेगारीकडे वळविण्यात येते आदी प्रकारांसाठी लहान मुलांचा अपहरण करून वापर केला जाऊ शकतो.सामाजिक संघटनांची उदासीनताबालकांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. परंतु, त्या बालकांना आई-वडिलांच्या स्वाधीन केले जाते. आई-वडील नसल्यास त्या बालकांना बालकल्याण समितीपुढे उभे करण्याचे काम पोलीस करतात. त्यानंतर त्यांना बालगृहात नेऊन सोडले जाते. या बालकांच्या शिक्षणासाठी सामाजिक संघटनांनी पुढे घ्यायला हवे, मात्र, जिल्ह्यातील बहुतांश सामाजिक संघटना यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येते.बेपत्ता व हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी 'आॅपरेशन मुस्कॉन' राबविले जात आहे. बालक मिळून आल्यानंतर चाईल्ड केअरकडे सोपविले जाते. ते पुढील प्रक्रिया राबवितात.- दिलीप झळके, पोलीस अधीक्षकहरविलेल्या व बेपत्ता बालकांचा शोध घेऊन त्यांना आई-वडिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आॅपरेशन मुस्कॉन मोहीम राबविली जात आहे. १ ते ३१ डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविली जात आहे.- नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक, महिला सेल