शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

राज्यात आठ महिन्यात ५३२ एसीबी ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

अमरावती/ संदीप मानकर राज्यात आठ महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५३२ ट्रॅप यशस्वी केले. यामध्ये ७४७ आरोपी अडकले असून, कोरोनाकाळातही ...

अमरावती/ संदीप मानकर

राज्यात आठ महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५३२ ट्रॅप यशस्वी केले. यामध्ये ७४७ आरोपी अडकले असून, कोरोनाकाळातही लाचखोरीचे प्रमाण वाढल्याचे पुढे आले आहे. राज्यात लाच खाण्यात पुणे विभाग अव्वल स्थानावर असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. या विभागात सर्वाधिक १०९ सापळे यशस्वी झाले आहेत.

राज्यात १ जानेवारी ते ८ सप्टेंबर या आठ महिन्याच्या कालावधीत ५३३ एसीबी सापळे, ६ अपसंपदा प्रकरणे, तर २ अन्य भ्रष्टाचाऱ्याचे असे एकूण ५४० गुन्ह्यांमध्ये ७६९ आरोपींचा समावेश आहे. २०२० या वर्षात ६३० ट्रॅप यशस्वी झाले होते. राज्यात यंदा सर्वात कमी ट्रॅप हे ३४ मुंबई विभागात झाले. ठाणे ५७, नाशिक ९१, नागपूर ४७, अमरावती ५२, औरंगाबाद ९९, तर नांदेड विभागात ४३ ट्रॅप पडले. यंदा कोरोना काळ असतानाही लाचखोरीच्या प्रमाणात घट झाली नाही, हे विशेष!

बॉक्स

लाचखोरीत महसूल विभाग अव्वल

लाचखोरीत पुन्हा महसूल विभागच अव्वलस्थानी असून महसूल, भूमीअभिलेख व नोंदणी कार्यालयतात राज्यात आठ महिन्यात १३३ सापळे यशस्वी झाले. यामध्ये १४ प्रथम श्रेणी अधिकारीसुद्धा अडकले आहेत. वर्ग - २ चे चार, वर्ग ३ चे १११ व वर्ग ४ चे ११ इतर लोकसेवक १४ आणि खासगी व्यक्ती ३९ असे एकूण १९३ आरोपींचा समावेश आहे. पोलीस विभागात १०८ ट्रॅप यशस्वी झात्याने लाचखोरीत हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. महावितरण ३९, महानगरपालिका ३, जिल्हा परिषद २४, पंचायत समिती ४३ व वनविभाग १४, सार्वजनिक बांधकाम विभाग ८, तर आरटीओ ८, शिक्षण विभाग १९ तसेच यामध्ये इतर विभागांचासुद्धा समावेश आहे.

बॉक्स

अपसंपदेची सहा प्रकरणे

राज्यात अपसंपदेची सहा प्रकरणे दाखल झाले आहेत. त्यात १० आरोपींचा समावेश आहे. अन्य भ्रष्टाचाराचे दोन प्रकरण दाखल झाले असून त्यामध्ये १२ आरोपींचा समावेश आहे. अपसंपदेचे चार गुन्हे हे मुंबई विभागात आणि दोन गुन्हे पुणे विभागात दाखल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.