शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

५२५ तलाठी साझांची पुनर्रचना

By admin | Updated: August 27, 2014 23:12 IST

जिल्ह्यातील महसूल विभागात महसूल विभागाचा मुख्य घटक असलेल्या तलाठ्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे तलाठ्यावर अतिक्ति कामाचा भार येत आहे. यामुळे शासकीय कामेही प्रभावित होत आहे

अमरावती : जिल्ह्यातील महसूल विभागात महसूल विभागाचा मुख्य घटक असलेल्या तलाठ्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे तलाठ्यावर अतिक्ति कामाचा भार येत आहे. यामुळे शासकीय कामेही प्रभावित होत आहे. या पार्श्वभूमीवर तलाठी साझाची पुनर्रचना करण्याचा निर्णय महसूल विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या नुकत्याच पार पडलेल्या मुंबईतील बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील सुमारे ५२५ तलाठी साझांची संख्या वाढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शासन व प्रशासन आणि सामान्य जनतेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून तलाठ्यांची जबाबदारी पार पाडतात. आवश्यक दस्ताऐवज देणे, शेतीचे फेरफार, शेतसारा वसुली आणि अन्य प्रकारची कामे त्यांच्याकडे आहेत. नैसर्गिक, आपत्तीच्या कालावधीत सर्वेक्षण व पंचनाम्याचे कामही तलाठ्यांना दिले जाते. मात्र महसूल यंत्रणेत तलाठ्याची अपूर्ण असलेली पदे लक्षात घेऊन त्यांच्याकडे कामांचा अतिरिक्त भार सांभाळावा लागत आहे. या प्रकाराने प्रशासकीय कामेही रखडून पडतात. अमरावती जिल्ह्यात सहा. महसूल उपविभागात सुमारे ५२५ तलाठी कार्यरत आहेत. मात्र यापैकी १० पदे रिक्त असून काही तलाठी निलंबित आहे. त्यामुळे इतर तलाठ्यावर अतिरिक्त कामांचा भार देण्यात आला आहे. अशात नवनवीन बदल, नवीन जिल्ह्याची महसूल उपविभागाची निर्मिती होत आहे. मात्र तलाठ्यांची पदे वाढली नाहीत. वाढत्या कामाच्या व्यापामुळे जिल्ह्यासह राज्यातील तलाठ्यांची रिक्त पदे भरावी, अशी मागणी शासन दरबारी वारंवार होत आहे. मात्र तरीही यावर निर्णय होत नव्हता. अखेर ४० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता तलाठी साझांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यात ५२५ तलाठी पदामध्ये भर पडणार असून महसूलची कामेही वेळेत होण्यास या निर्णयाची मदत होणार आहे. याबाबतचे धोरण वरिष्ठ पातळीवर ठरले आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या नसल्याने याला आता याचा मुहूर्त केव्हा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)