शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शंभर ठिकाणी प्रभारींवर धुरा; ...म्हणे ४०५ जण ८४० ग्रामपंचायतींसाठी काम करा

By जितेंद्र दखने | Updated: May 30, 2023 18:26 IST

गावगाड्यावर विस्कळित : मेळघाटात कोरम पूर्ण : १२ तालुक्यांत अपूर्ण

अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींसाठी ५२० ग्रामसेवकांची पदे मंजूर आहेत. एकीकडे ग्रामपंचायतींच्या तुलनेत १०५ पदे कमी आहेत, तर दुसरीकडे मंजूर पदांपैकी ११० ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत ४०५ ग्रामसेवकांना दोन-तीन ग्रामपंचायतींचा कारभार पाहावा लागत असून, अशा स्थितीत ‘कसा होणार गावांचा विकास अन् कसे सुटणार ग्रामस्थांचे प्रश्न’ असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

देशाचा विकास साध्य करायचा असेल तर गावांचा विकास झाला पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही ‘खेड्याकडे चला’ असा संदेश दिला होता; परंतु शासन, प्रशासनाला महात्मा गांधी यांच्या संदेशाचा जणू विसर पडला आहे. गावखेड्यांचा विकास साध्य करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत; परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या ग्रामसेवकांची रिक्तपदे भरण्याकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यात ८४० ग्रामपंचायतींसाठी ५१० ग्रामसेवकांची पदे मंजूर आहेत; परंतु या मंजूर पदांमध्ये ग्रामसेवकांची १०५ पदे रिक्त आहेत. परिणामी, ८४० ग्रामपंचायतींचा कारभार ४०५ ग्रामसेवकांच्या खांद्यावर पडला आहे. अशातच तक्रारी, चौकशीच्या फेऱ्यांत काही ग्रामसेवक अडकल्याने कार्यरत ग्रामसेवकांना दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार पाहावा लागत आहे.

योजनांची अंमलबजावणी विस्कळीत

शासकीय योजनांची कामे ऑनलाइन झाली आहेत. ग्रामविकास विभागाकडून थेट ग्रामपंचायतींकडे निधी येत आहे. त्याशिवाय १५ वा वित्त आयोग, २५-१५, १२-३८, रोहयोअंतर्गत ९५५, खासदार फंडाची कामे, पीएम किसान योजनेसह महसूल, कृषी व इतर विभागांच्या अनेक योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतींनाच करावी लागते; परंतु ग्रामसेवकांचीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणार कशी? हा खरा प्रश्न आहे.

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे शासन आणि ग्रामस्थांमधील दुवा म्हणून काम पाहतात; परंतु अपुरी पदे असल्याने कामाचा अधिक ताण वाढला आहे. शासनाने रिक्त पदे भरण्यासोबतच प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी देणे गरजेचे आहे. त्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे.

- कमलाकर वनवे, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAmravatiअमरावती