शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
4
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
5
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
6
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
7
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
8
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
9
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
10
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
11
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
12
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
13
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
14
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
15
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
16
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
17
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
18
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
19
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
20
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

नैसर्गिक आपत्तीचे यंदा ५१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:14 IST

अमरावती : ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. ...

अमरावती : ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. दरम्यान या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे ५१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय १९ गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. या आपत्तीमुळे ६,७८३ गावांतील ५०,८४१ नागरिक बाधित झालेले आहे.

पश्चिम विदर्भात यंदा ५५ पैकी ४२ तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी सध्या पार केलेली आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या ५९ टक्केच पाऊस झालेला आहे. त्यातुलनेत उर्वरित १२ तालुक्यात पावसाची स्थिती समाधानकारक आहे. ऑगस्ट महिन्यापासून पावसाने चांगलाच जोर पकडलेला आहे. या कालावधीत चार ते पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे १५,२२२ हेक्टर शेती खरडून गेली व या आपत्तीमुळे २,२२,४१० हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांनी शासनाला पाठविलेला आहे.

या अपत्तीमुळे १३ सार्वजनिक मालमत्तांचे ८९.१८ कोटींचे नुकसान झालेले आहे. याशिवाय ४८६ घरांची पूर्णत: व ७,९५३ घरांची व ७,३१६ कच्चा घरांची अंशत: पडझड झालेली आहे. याआपत्तीत ६७ गोठेदेखील जमीनदोस्त झालेले आहे. या नागरिकांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही.

बॉक्स

वीज पडून २०, पुरात वाहून २१ जणांचा मृत्यू

* या आपत्तीत सर्वाधिक २१ जणांचा पुरात वाहून गेल्याने व २० जणांचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. भिंत अंगावर कोसळून चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १.६८ कोटींची मदत मृतांच्या वारसांना देण्यात आलेली आहे.

* या आपत्तीत १४१ मोठी दुधाळ जनावरे व ५९४ लहान दुधाळ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय ओढकाम करणाऱ्या ६० जनावरांचा व २० लहान जनावरांचा मृत्यू झालेला आहे. शासनाद्वारा अद्याप पशुपालकांना मदत मिळालेली नाही.