शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

नैसर्गिक आपत्तीचे यंदा ५१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:14 IST

अमरावती : ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. ...

अमरावती : ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. दरम्यान या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे ५१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय १९ गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. या आपत्तीमुळे ६,७८३ गावांतील ५०,८४१ नागरिक बाधित झालेले आहे.

पश्चिम विदर्भात यंदा ५५ पैकी ४२ तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी सध्या पार केलेली आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या ५९ टक्केच पाऊस झालेला आहे. त्यातुलनेत उर्वरित १२ तालुक्यात पावसाची स्थिती समाधानकारक आहे. ऑगस्ट महिन्यापासून पावसाने चांगलाच जोर पकडलेला आहे. या कालावधीत चार ते पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे १५,२२२ हेक्टर शेती खरडून गेली व या आपत्तीमुळे २,२२,४१० हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांनी शासनाला पाठविलेला आहे.

या अपत्तीमुळे १३ सार्वजनिक मालमत्तांचे ८९.१८ कोटींचे नुकसान झालेले आहे. याशिवाय ४८६ घरांची पूर्णत: व ७,९५३ घरांची व ७,३१६ कच्चा घरांची अंशत: पडझड झालेली आहे. याआपत्तीत ६७ गोठेदेखील जमीनदोस्त झालेले आहे. या नागरिकांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही.

बॉक्स

वीज पडून २०, पुरात वाहून २१ जणांचा मृत्यू

* या आपत्तीत सर्वाधिक २१ जणांचा पुरात वाहून गेल्याने व २० जणांचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. भिंत अंगावर कोसळून चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १.६८ कोटींची मदत मृतांच्या वारसांना देण्यात आलेली आहे.

* या आपत्तीत १४१ मोठी दुधाळ जनावरे व ५९४ लहान दुधाळ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय ओढकाम करणाऱ्या ६० जनावरांचा व २० लहान जनावरांचा मृत्यू झालेला आहे. शासनाद्वारा अद्याप पशुपालकांना मदत मिळालेली नाही.