शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

नैसर्गिक आपत्तीचे यंदा ५१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:14 IST

अमरावती : ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. ...

अमरावती : ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. दरम्यान या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे ५१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय १९ गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. या आपत्तीमुळे ६,७८३ गावांतील ५०,८४१ नागरिक बाधित झालेले आहे.

पश्चिम विदर्भात यंदा ५५ पैकी ४२ तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी सध्या पार केलेली आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या ५९ टक्केच पाऊस झालेला आहे. त्यातुलनेत उर्वरित १२ तालुक्यात पावसाची स्थिती समाधानकारक आहे. ऑगस्ट महिन्यापासून पावसाने चांगलाच जोर पकडलेला आहे. या कालावधीत चार ते पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे १५,२२२ हेक्टर शेती खरडून गेली व या आपत्तीमुळे २,२२,४१० हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांनी शासनाला पाठविलेला आहे.

या अपत्तीमुळे १३ सार्वजनिक मालमत्तांचे ८९.१८ कोटींचे नुकसान झालेले आहे. याशिवाय ४८६ घरांची पूर्णत: व ७,९५३ घरांची व ७,३१६ कच्चा घरांची अंशत: पडझड झालेली आहे. याआपत्तीत ६७ गोठेदेखील जमीनदोस्त झालेले आहे. या नागरिकांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही.

बॉक्स

वीज पडून २०, पुरात वाहून २१ जणांचा मृत्यू

* या आपत्तीत सर्वाधिक २१ जणांचा पुरात वाहून गेल्याने व २० जणांचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. भिंत अंगावर कोसळून चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १.६८ कोटींची मदत मृतांच्या वारसांना देण्यात आलेली आहे.

* या आपत्तीत १४१ मोठी दुधाळ जनावरे व ५९४ लहान दुधाळ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय ओढकाम करणाऱ्या ६० जनावरांचा व २० लहान जनावरांचा मृत्यू झालेला आहे. शासनाद्वारा अद्याप पशुपालकांना मदत मिळालेली नाही.