शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ५०७ बालकांचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2017 00:19 IST

कुपोषणाचा कलंक लागलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वर्षभरात ० ते ६ वयोगटातील ५०७ बालकांचा मृत्यू झाला.

मेळघाटात कुपोषणाचे तांडव : २२ मातामृत्यू, १८० बालके जन्मत:च दगावलीचिखलदरा : कुपोषणाचा कलंक लागलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वर्षभरात ० ते ६ वयोगटातील ५०७ बालकांचा मृत्यू झाला. डोळे उघडून जग पाहण्यापूर्वीच १८० उपजत बालकांसोबत २२ माता मृत्यूंचीही नोंद झाल्याने मेळघाटातील वास्तव पुन्हा एकदा कुपोषणाचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या माहितीची नोंद शासन दरबारी झाली आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षभराच्या कालावधीत मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात ० ते ६ वयोगटातील ५०७ बालकांनी कुपोषणामुळे मृत्यूला कवटाळले, तर १८० उपजत बालकांचा मृत्यू होण्यासोबत २२ आदिवासी मातांनासुद्ध पोषणाअभावी मृत्यूला जवळ करावे लागले. येथील आदिवासीबहुल अतिदुर्गम परिसर पाहता येथील आदिवासांनी मूलभूत सविधा मिळाव्यात, यासाठी आरोग्य यंत्रणा, अंगणवाडी आदी यंत्रणा शासनातर्फे कार्यरत असताना वर्षभरात ० ते ६ अशा एकूण ६८७ बालकांचा मृत्यू झाला आहे. दहा वर्षांत हेच चक्र सुरू आहे. मेळघाटात समाविष्ठ असलेल्या धारणी व चिखलदरा तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनातर्फे दिला जातो. यासह येथे आरोग्य विकासाच्या दृष्टिकोनातून विविध योजना राबविल्या जातात. मात्र, आदिवासी खेड्यापर्यंत त्या पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणामुळे येथील परिस्थिती दुुरुस्त झाली नसल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)७९ बालके कुपोषितमेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात ० ते ६ वयोगटातील ३४,८६४ बालकांपैकी ३०,७९४ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यापैकी सर्वसाधारण श्रेणीत २५,९७३ बालक असून तीव्र कुपोषीत (मॅम) ७४२ तर अतीतीव्र कुपोषित (सॅम) ७९ बालकांचा समावेश असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. या ७९ बालकांना जलजन्य व इतर आजारापासून वाचविण्याची नितांत गरज आहे.‘खोज’मध्ये झाली बैठकवर्षभरात मोठ्या प्रमाणात बालमृत्यूचा आकडा फुगल्याने मेळघाटात कार्यरत स्वयंसेवी संस्था खोजतर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन संस्थेचे बंड्या साने यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. यावेळी सुनील कास्देकर, रामबाबू दहीकर, शारदा घीरे, सोमेश्वर चांदूरकर, शशीकांत बळीद सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बालमृत्यूच्या विविध कारणांसह त्यावर उपाययोजनेविषयी चर्चा करीत पुढील बैठक २४ मे रोजी घेण्याचे ठरविण्यात आले. प्रशासनासोबत काम करून बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.मागील वर्षभरात ५०७ बालक ० ते ६ तर १८० उपजत आणि २२ माता मृत्यू झाले. मागील दहा वर्षांअगोदरप्रमाणे ही आकडेवारी धक्का देणारी आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष देत समन्वयाने कार्य करण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्था म्हणून आम्ही कार्य करीत आहोत. त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.- बंड्या साने,खोज संस्था, मेळघाट