शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

पश्चिम विदर्भातील ५११ सिंचन प्रकल्पात ५०.४५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:12 IST

संदीप मानकर अमरावती : पश्चिम विदर्भात तीन दिवसाच्या दमदार पावसामुळे ५११ सिंचन प्रकल्पात ५०.४५ टक्के पाणीसाठा साचला आहे. ...

संदीप मानकर अमरावती : पश्चिम विदर्भात तीन दिवसाच्या दमदार पावसामुळे ५११ सिंचन प्रकल्पात ५०.४५ टक्के पाणीसाठा साचला आहे. सात विविध प्रकल्पांची २६ दारे उघडण्यात आली असून, त्यातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने अनेक नद्या दुथडी वाहत आहेत.

विशेषत: पश्चिम विदर्भातील २५ मध्यम प्रकल्पांत २५ जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, ५७.९३ टक्के पाणीसाठा साचला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पात सरासरी ५५.४१ टक्के पाणीसाठा साचला आहे. ४७७ लघु प्रकल्पात मात्र ३९.६६ टक्के पाणीसाठा आहे. ५११ प्रकल्पाची संकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा हा १६५६.६२ दलघमी आहे. त्याची सरासरी टक्केवारी ही ५०.४५ टक्के ऐवढी आहे. २५ ते २८ जुलै दरम्यान विदर्भात बरेच ठिकाणी बरेच ठिकाणी पाऊस राहणार असून, यवतमाळ जिल्ह्यात आजपासून पावसाच्या प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला.

बॉक्स

नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५४.३९ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यतील पूस प्रकल्पात सर्वाधिक १०० टक्के, अरुणावती ६६.५२ टक्के, बेंबळा ६६.८९ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ६२.९६ टक्के, वान ४६.२७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यतील नळगंगा प्रकल्पात २८.३८ टक्के, पेनटाकळी ३२.९५ टक्के, खडकपूर्णा १०.७४ टक्के पाणीसाठा आहे.