शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

यवतमाळ राज्य मार्ग निर्मितीसाठी ५०० कोटींचा डीपीआर शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:10 IST

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शेतकरी, वाहन चालक त्रस्त, अपघाताची भीती बळावली अमरावती : बडनेरा ते यवतमाळ या मार्गाची अत्यंत दयनीय ...

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शेतकरी, वाहन चालक त्रस्त, अपघाताची भीती बळावली

अमरावती : बडनेरा ते यवतमाळ या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अमरावती जिल्ह्याच्या सीमेपर्यंत मोजता न येणारे खड्डे पडलेले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने यवतमाळ राज्य निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असताना तो प्रलंबित असल्याची माहिती आहे. किमान या वर्दळीच्या मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी, दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांची होत आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बडनेरा हद्दीतून अमरावती ते यवतमाळ हा ४० कि.मी. लांबीचा रस्ता असून या मार्गावर अकोलानंतर सर्वाधिक वाहने धावतात. परंतु, दोन वर्षात या मार्गाकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यामुळे जावरा ते अमरावती जिल्हा सीमेपर्यंत ३० कि.मी. ‘रस्त्यात खड्डा की खडड्यात रस्ता’ अशी स्थिती झाली आहे. दुसरीकडे बांधकाम विभागाने या रस्त्याचा सिमेंट कॉक्रिटीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र, राज्य शासनाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने या प्रस्तावाला केव्हा मान्यता मिळेल, हे तूर्त कुणी सांगू शकत नाही. मात्र, अपघातापासून बचाव करण्यासाठी तात्पुरते खड्डे बुजवावे, अशी माफक मागणी वाहनचालक, गावकऱ्यांची आहे.

----------------

बाॅक्स

समृद्धीच्या कामांमुळे आणखीच भर

यवतमाळ राज्य मार्गावर शिवणी गावापासून बाळासाहेब ठाकरे समृद्धी ध्रुतगती महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामांसाठी टिप्पर, ट्रक, जेसीबी अशा वाहनांच्या वर्दळीमुळे जिल्हा सीमापासून नांदगावपर्यंत रस्ता पूर्ण नादुरूस्त आहे कंत्राटदाराने कुठलीचं खबरदारी घेतलेली नाही. परिणामी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना या ठिकाणाहून धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागतो.

------

बाॅक्स

बेंबळा पूल अपघाताला निमंत्रण

अमरावती ते यवतमाळ मार्गावर शिवणी जवळ असलेला बेंबळा नदीवरील पूल हा मोठा व जुना असल्याने शिकस्त झाला आहे. पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. शिवाय पुलाचे दोन्ही बाजूचे लोखंडी कठडे तुटलेले आहे. अत्यंत वळणावर असलेला हा पूल वाहनांसाठी धोकादायक बनलेला आहे. येथे इशारा देणारे फलक, पांढरे पट्टे मारलेले नाही किंवा पुलाची दुरुस्ती केलेली नाही. हा पूल केव्हा कोसळेल याचा नेम नाही.

कोट

यवतमाळ राज्य मार्गाचा ५०० कोटींचा डीपीआर शासनाकडे पाठविला आहे. हायब्रिड ॲन्युटी अथवा आशिया विकास प्लॅनमधून निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. खड्डे भरून चालणार नाही. कायमस्वरूपी उपाययोजना चालविल्या आहेत.

- अरूंधती शर्मा, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती