शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

अमरावती जिल्ह्यात वाघावर लक्ष ठेवण्यासाठी ५० ट्रॅप कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 12:59 IST

गत आठवड्यापासून धामणगाव तालुक्यातील मंगरूळ, अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालून मानवसंहार करणाऱ्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी नव्याने ५० ट्रॅप कॅमेरे बसविले जातील, असा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देमंगरूळ, अंजनसिंगी, मोझरी परिसरावर नजर : मानवसंहार रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत आठवड्यापासून धामणगाव तालुक्यातील मंगरूळ, अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालून मानवसंहार करणाऱ्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी नव्याने ५० ट्रॅप कॅमेरे बसविले जातील, असा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. वाघांचे कॅरीडोर असलेल्या भागात हे कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर आणि अंजनसिंगी परिसरातील मोरेश्र्वर वाळके यांना वाघाने क्रूरतेने ठार केले. त्यानंतर वनविभागाने त्वरेने उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. एपीसीसीएफ सुनील लिमये यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सकाळच्या सुमारास वनाधिकाºयांची बैठक झाली. यात अमरावतीचे मुख्यवनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक हरिश्र्चंद्र वाघमोडे, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, राजेंद्र बोंडे, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर, चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्राधिका आशिष कोकाटे आदी उपस्थित होते. पांढरकवडा, राळेगाव येथील नरभक्षी वाघिणीचा धुमाकूळ रोखण्यात वनविभागाला अपयश आले असताना अशातच धामणगाव रेल्वे तालुक्यात तीन दिवसांत दोन जणांचा बळी घेतल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे. अशातच गुरूवारी सकाळी या नरभक्षक वाघाचे मोझरी, वऱ्हा, कुऱ्हा आदी भागात वास्तव्य दिसून आल्याने आता या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कुऱ्हा भागात जंगलात वन्यजीवांवर लक्ष ठेवण्यासाठी काही ठिकाणी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाल्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजनांवर वनाधिकाऱ्यांनी मंथन केले. काही वनकर्मचाऱ्यांची चमू मोझरी, वऱ्हा, कुऱ्हा भागात तैनात करण्यात आली आहे. मात्र, वाघाच्या मानवसंहार रोखण्यासाठी वनविभागाने आवश्यक उपाययोजना करून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी काम करावे, अशा सूचना सुनील लिमये यांनी दिल्यात. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना भयभीत होण्यापासून रोखावे, असेही लिमये यांनी बैठकीत सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ