शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

घरकुलाच्या जागेसाठी ५० हजारांची मदत

By admin | Updated: January 25, 2016 00:21 IST

शासकीय योजनांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकूल दिले जाते. मात्र स्वत:ची जागा नसल्यास घरकूल मिळण्यास अडचण निर्माण होते.

अनुदान : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना योजनेतून लाभअमरावती : शासकीय योजनांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरकूल दिले जाते. मात्र स्वत:ची जागा नसल्यास घरकूल मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून आता घरकुलाच्या जागेसाठीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय घरकूल जागा खरेदी योजनेंतर्गत जागा नसलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वत:ची जागा नाही अशा कुटुंबाकरिता जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात योजनेस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत आहे. यामध्ये केंद्र व राज्याचा वाटा ५० टक्के आहे. केवळ जागेअभावी लाभार्थी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये हा शासनाचा उद्देश आहे. ही योजना इंदिरा आवास योजना, रमाई आवास व शबरी आवास योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकूलपात्र परंतु जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लागू राहणार आहे. भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी १० हजार रूपये आणि या योजनेंतर्गत ४० हजार रूपये अशाप्रकारे ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत ५०० चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मोठ्या ग्रामपंचायती व शहराशेजारील ग्रामपंचायतींमध्ये जागेचे अधिक दर व जागेची कमी उपलब्धता विचारात घेता ५०० चौरस फुटांपर्यंत जागेत स्थानिक प्राधिकरणाच्या बांधकाम नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थ्यांच्या संमतीने दुमजली, तीन मजली इमारत बांधण्यासाठी लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य जागा खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. (प्रतिनिधी)असे आहेत जागेसाठीचे नियमयोजनेसाठी ग्रामपंचायतींतर्गत गावठाण हद्दीतील व हद्दीबाहेरील सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजुरी दिलेली अकृषक जागा, लाभार्थ्याने सहमती दिलेली जागा असावी, लाभार्थ्याला जागा मालकाबरोबर विक्री करार करावा लागणार आहे. जागेची खरेदी करताना समिती समन्वय ठेवणार आहे. जागेचा देय निधी लाभार्थ्याच्या बँक, पोस्ट खात्यावर जमा करण्यास समिती मान्यता देईल. जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. जागेचा देय निधी लाभार्थ्याच्या बँक, पोस्ट खात्यावर जमा करण्यास समिती मान्यता देईल. जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. खरेदीनंतर जागेची नोंद ग्रामपंचायतीकडे समितीमार्फत करण्यात येईल. जागेची नोंद प्राधान्याने लाभधारकांच्या परतीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येणार आहे.