शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीच्या ५० फेऱ्या बंद, महिन्याकाठी सव्वाकोटीचा फटका; प्रवाशांची गैरसोय

By जितेंद्र दखने | Updated: April 5, 2023 19:01 IST

राज्य परिवहन महामंडळाचे एकीकडे प्रवाशांना विविध सवलती देऊन एसटीने प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

अमरावती: राज्य परिवहन महामंडळाचे एकीकडे प्रवाशांना विविध सवलती देऊन एसटीने प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे, तर दुसरीकडे अमरावती विभागातील १०४ एसटी बस एक्स्पायर झाल्याने गत दोन वर्षांपासून लांब पल्ल्याच्या २१ आणि मध्यम पल्ल्याच्या २९ बस फेऱ्या, अशा एकूण ५० फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. परिणामी, दिवसाला १५ हजार किलोमीटर प्रवास कमी झाला आहे. त्यामुळे एसटीला दिवसाकाठी साडेचार लाख रुपयांचा अन् महिन्याकाठी सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. 

पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची यामुळे गैरसोय होत आहे. त्यांना नाइलाजाने खाजगी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेचा पर्याय शोधावा लागत आहे. अमरावती विभागाने एसटी महामंडळाकडे १०० नवीन बसची मागणी केली आहे. त्यापैकी २० बस आगामी काही दिवसांत मिळणार असल्या तरी आजघडीला ज्या बस आहेत. त्यांचीही स्थिती फारशी चांगली नाही. त्यापैकी काही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. बसची संख्या जर पुरेशी नसेल, तर साहजिकच फेऱ्या कमी होतील. प्रवाशांना त्या त्यावेळी प्रवास करता येणार नाही.

मग सवलत देऊन फायदाच काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने अमरावतीला विभागात नवीन बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग हे एसटीमधून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून एसटीने विभागातील एसटी फेऱ्या कायम ठेवल्या असल्या तरी लांब व मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्याने लांबवर प्रवास करणारे प्रवासी सध्या त्रस्त आहेत. सध्या अमरावती विभागात ४५ शिवशाही अन् ३ हिरकणी आहेत. या दोन्ही प्रकारच्या बस आरामदायक असल्याने लांब पल्ल्यासाठी वापरल्या जातात; परंतु सध्या त्यापैकी काही या जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी, तसेच नागपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या शहराकडे पाठवण्यात येतात. त्यांच्याही फेऱ्या कमी झाल्या आहेत.

२० ते ३० रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे प्रवास भाडेलांब पल्ल्याच्या किंवा मध्यम पल्ल्याच्या बससाठी २० ते ३० रुपये प्रति किलोमीटर भाड्याखाली जाते; परंतु पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या शहरांकडे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या आधीच्या तुलनेत आता ५० टक्के कमी केल्यामुळे साहजिकच उत्पन्नातही घट झाली आहे. २० ते ३० रुपये किमी दराने विचार करता एसटीचे दररोज ४ लाख ५० हजारांचे, तर महिन्याला सुमारे १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न बुडत आहे.

एसटी बसची संख्या कमी झाल्यामुळे लांब व मध्यम पल्ल्याच्या बसच्या फेऱ्या या निम्म्याने कमी कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे एसटीला दिवसाला सुमारे साडेचार लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या फेऱ्या कमी करून जिल्ह्यातील फेऱ्या कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. - नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, अमरावती ४०५ पैकी ३६१ बस विभागाकडेगत दोन वर्षांपूर्वी अमरावती विभागाकडे ४६५ बस होत्या. त्यापैकी १०४ बस निर्लेखित केलेल्या आहेत. ३६१ बस आहेत. त्यातील सर्वच बस एकाच वेळी रस्त्यावर धावत नाहीत. काही बस दुरुस्ती, आरटीओ पासिंगसाठी जातात. 

टॅग्स :Amravatiअमरावती