शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

लालपरीच्या ५० फेऱ्या बंद, महिन्याकाठी सव्वाकोटीचा फटका; प्रवाशांची गैरसोय

By जितेंद्र दखने | Updated: April 5, 2023 19:01 IST

राज्य परिवहन महामंडळाचे एकीकडे प्रवाशांना विविध सवलती देऊन एसटीने प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

अमरावती: राज्य परिवहन महामंडळाचे एकीकडे प्रवाशांना विविध सवलती देऊन एसटीने प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे, तर दुसरीकडे अमरावती विभागातील १०४ एसटी बस एक्स्पायर झाल्याने गत दोन वर्षांपासून लांब पल्ल्याच्या २१ आणि मध्यम पल्ल्याच्या २९ बस फेऱ्या, अशा एकूण ५० फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. परिणामी, दिवसाला १५ हजार किलोमीटर प्रवास कमी झाला आहे. त्यामुळे एसटीला दिवसाकाठी साडेचार लाख रुपयांचा अन् महिन्याकाठी सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. 

पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची यामुळे गैरसोय होत आहे. त्यांना नाइलाजाने खाजगी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेचा पर्याय शोधावा लागत आहे. अमरावती विभागाने एसटी महामंडळाकडे १०० नवीन बसची मागणी केली आहे. त्यापैकी २० बस आगामी काही दिवसांत मिळणार असल्या तरी आजघडीला ज्या बस आहेत. त्यांचीही स्थिती फारशी चांगली नाही. त्यापैकी काही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. बसची संख्या जर पुरेशी नसेल, तर साहजिकच फेऱ्या कमी होतील. प्रवाशांना त्या त्यावेळी प्रवास करता येणार नाही.

मग सवलत देऊन फायदाच काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने अमरावतीला विभागात नवीन बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग हे एसटीमधून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून एसटीने विभागातील एसटी फेऱ्या कायम ठेवल्या असल्या तरी लांब व मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्याने लांबवर प्रवास करणारे प्रवासी सध्या त्रस्त आहेत. सध्या अमरावती विभागात ४५ शिवशाही अन् ३ हिरकणी आहेत. या दोन्ही प्रकारच्या बस आरामदायक असल्याने लांब पल्ल्यासाठी वापरल्या जातात; परंतु सध्या त्यापैकी काही या जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी, तसेच नागपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या शहराकडे पाठवण्यात येतात. त्यांच्याही फेऱ्या कमी झाल्या आहेत.

२० ते ३० रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे प्रवास भाडेलांब पल्ल्याच्या किंवा मध्यम पल्ल्याच्या बससाठी २० ते ३० रुपये प्रति किलोमीटर भाड्याखाली जाते; परंतु पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या शहरांकडे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या आधीच्या तुलनेत आता ५० टक्के कमी केल्यामुळे साहजिकच उत्पन्नातही घट झाली आहे. २० ते ३० रुपये किमी दराने विचार करता एसटीचे दररोज ४ लाख ५० हजारांचे, तर महिन्याला सुमारे १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न बुडत आहे.

एसटी बसची संख्या कमी झाल्यामुळे लांब व मध्यम पल्ल्याच्या बसच्या फेऱ्या या निम्म्याने कमी कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे एसटीला दिवसाला सुमारे साडेचार लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या फेऱ्या कमी करून जिल्ह्यातील फेऱ्या कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. - नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, अमरावती ४०५ पैकी ३६१ बस विभागाकडेगत दोन वर्षांपूर्वी अमरावती विभागाकडे ४६५ बस होत्या. त्यापैकी १०४ बस निर्लेखित केलेल्या आहेत. ३६१ बस आहेत. त्यातील सर्वच बस एकाच वेळी रस्त्यावर धावत नाहीत. काही बस दुरुस्ती, आरटीओ पासिंगसाठी जातात. 

टॅग्स :Amravatiअमरावती