शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दारुबंदीनंतर अपघातात ५० टक्के घट

By admin | Updated: April 20, 2017 00:04 IST

हायवेपासून ५०० मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय झाल्याने दारूविक्रीवर अंकुश आला आहे.

१९ दिवसांची आकडेवारी : कौटुंबिक कलह देखील अंशत: शमले वैभव बाबरेकर अमरावतीहायवेपासून ५०० मीटर अंतरावरील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय झाल्याने दारूविक्रीवर अंकुश आला आहे. हायवेवर दारू सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील ५० टक्के अपघात घटल्याचे सुखद चित्र दिसून येत आहे. "लोकमत" ने १९ दिवसांतील अपघातांची माहिती घेतली असता ही बाब समोर आली आहे. याबाबीला इर्विन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, पोलीस व रुग्णवाहिका चालकांनीही दुजोरा दिला आहे, हे विशेष. दारुबंदीच्या निर्णयाचे अमरावतीकरांनी स्वागत केले आहे. महिलांनी तर हा निर्णय डोक्यावर घेतलाय. जिल्ह्यात कुठेही अपघात घडल्यास जखमी व मृतांना प्रथम इर्विन रुग्णालयात आणले जाते. अपघाताविषयी गुन्हे दाखल होत असल्यामुळे पोलिसांकडून सर्वप्रथम जखमी व मृतांची नोंद इर्विन रुग्णालयातील पोलीस चौकीत केली जाते. या नोंदीनुसार दारुबंदीनंतरच्या १ ते १९ एप्रिल या कालखंडात अपघाताच्या २० घटना घडल्या असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. तुलनेत दारुबंदीपूर्वीच्या १९ दिवसांत तब्बल ३६ अपघात घडले असून त्यामध्ये ५ जण ठार झाले आहेत. दारूबंदीपूर्वी सर्वाधिक अपघात मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे झाल्याचे इर्विनच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दारुबंदीनंतरचे बहुतांश अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळे झाल्याचे दिसून आले आहे. दारुबंदीपूर्वी जिल्ह्यात कुठेही सहजरित्या दारुमिळत होती.शहर अपघातविरहित होणार का ?अमरावती : त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांची संख्या अधिक होती. मद्यधुंद चालकांमुळे वाहन अनियंत्रित होऊन अपघात घडत होते. दारुबंदीनंतर आता मद्यपींना सहजरित्या दारु मिळत नसल्याने प्रवास सुखकर होतो. दारूसाठी आटापिटा करणे बरेच लोक टाळतात. शिवाय अवैध दारु खरेदी करताना दामदुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने दारू पिण्यावर आपसुकच निर्बंध आले आहेत. आधी बारमध्ये मित्रांसोबत गप्पा करीत दारू पिण्याचा ट्रेंड होता. त्यामुळे अतिमद्यप्राशन केलेल्या अवस्थेत बारमधून बाहेर पडणे आणि बेभान वाहन चालवित घरी जाणे, हे प्रकार पूर्वी अधिक प्रमाणात होत असत. मात्र, आता बारमध्ये बसून मद्य पिणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळेच मद्यपी शुद्धीवर राहूनच घरी पोहोचत आहेत. परिणामी अपघातही कमी झाले आहेत. हिच स्थिती कायम राहिल्यास अमरावती शहर अपघातविरहित होण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उमटत आहेत. (प्रतिनिधी)वाहतूक शाखेचाही दुजोराशहरातील अनियंत्रीत वाहतूक सुरळीत करण्याचे सातत्याने प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेला दारुबंदीनंतर थोडा दिलासा मिळाला आहे. दारुबंदीपूर्वी मद्यधुंद वाहनचालकांचे प्रमाण अधिक होते. मात्र, तुलनेत आता मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्वी ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’च्या कारवाई दररोज होत असत. मात्र, आता कारवाई नगण्य आहेत. अपघातांचे प्रमाण घटल्याचेही सहायक पोलीस आयुक्त डोंगरदिवे यांनी सांगितले. मद्यपींची वर्दळ कमीदारूबंदीपूर्वी चिल्लर दारूविक्रीच्या दुकानांमध्ये वारंवार जाऊन दारू पिणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र, आता बहुतांश दुकाने बंद झाल्यामुळे पाचशे मीटर लांबवर दारु पिण्यासाठी जाणे बहुतांश मद्यपी टाळत आहेत. त्यामुळे शहरातून मद्यपींची वर्दळ सुद्धा कमी झाली आहे. पूर्वी दारू दुकानांच्या आसपास मद्यपींची गर्दी दिसत असे, आता ती ओसरली आहे. संसारही झाले सुरळीतदारुमुळे अनेकांचे संसार उद्घस्त झाले आहेत. पूर्वी दारू पिऊन उशिरा घरी येणारे आणि मारझोड करणारे नवरे आता शांत झाल्याने कित्येक महिलांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दारूबंदीच्या निर्णयाचे स्वागतच होत आहे.