शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या अनुदानात ५० टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:31 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात ५० टक्के कपात लागू झाल्याने शाळा चालवायच्या कशा, असा पेच शिक्षकांपुढे उभा झाला आहे. पहिली ते आठवीच्या शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत हे अनुदान लागू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिक्षकांपुढे पेच : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा चालवायच्या कशा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात ५० टक्के कपात लागू झाल्याने शाळा चालवायच्या कशा, असा पेच शिक्षकांपुढे उभा झाला आहे. पहिली ते आठवीच्या शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत हे अनुदान लागू करण्यात आले आहे.शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी प्रतिशिक्षक पाचशे रुपये शाळेला लागणाऱ्या स्टेशनरीसह विज देयकासाठी प्राथमिक शाळांना ५ हजार व उच्च प्राथमिक शाळांना १२ हजार रुपये, देखभाल दुरुस्तीसाठी प्रतिशिक्षक ५ ते १० हजार रुपये अनुदान प्राप्त होत असे. उच्च प्राथमिक शाळेत ८ खोल्या मुख्याध्यापकांसह ८ शिक्षक व दोनशेपर्यंत विद्यार्थी असल्यास १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असे. पण, आता शंभर पटसंख्येस १० हजार रुपये, २५० च्या पटसंख्येतील शाळांना १५ हजार रुपये, ५०० पटसंख्या असल्यास २० हजार रुपये व एक हजार पटसंख्या असल्यास २५ हजार रुपये अनुदान देण्याचे शासनाने ठरविले आहे. या अनुदानातून स्वच्छ पेयजल, स्वच्छतागृहांची व्यवस्था प्रशासकीय कामकाज शैक्षणिक व सहशालेय उपक्रम देखभाल व दुरुस्ती संगणक आदी उपकरणांची दुरुस्ती व वीज देयकांचा भरणा करणे अपेक्षित आहे. मंजूर अनुदानातून खर्च भागवणार कसा, हा प्रश्न मुख्याध्यापकांना सतावत आहे.काही उपक्रमात शासनाने लोकवर्गणीचा पर्याय दिला. पण ग्रामीण भागात वर्गणी देण्याची नागरिकांची ऐपत नसते. उलट मुलांचा खर्च शिक्षकांना भागवावा लागतो. चार वर्षांपासून अशा शाळांच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेचेंस मिळालेले नाहीत. दुरुस्तीसाठी निधी नाही.शालेय पोषण आहारांतर्गत मिळणाºया पट्या किंवा आसनपट्ट्यांचा पुरवठा बंद आहे. वीज कंपनीचे सेमी वाणिज्य दराने शाळांना वीजपुरवठा करते. शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे संगणक संच स्मार्ट बोर्ड तसेच वॉटर कूलर, दिवे अशा बाबींसाठी विजेचा वापर अपरिहार्य ठरतो. १५० ते २०० पटसंख्या असणाऱ्या शाळांना महिन्याकाठी किमान ११०० रुपये, तर वर्षाला १३ हजार रुपये वीज देयकांसाठी खर्च करावा लागतो.आतापर्यंत सर्वशिक्षा अभियानातून अनुदान देताना पटसंख्येची अट नव्हती. परंतु, आता समग्रमध्ये शाळांना अनुदान देताना पटसंख्येची अट लागू केली. ही अट न टाकता व अनुदान कपात न करता शाळांसाठी वाढीव अनुदान शासनाने द्यावे- राजेश सावरकर,राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती