शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागात ५० लाखांची औषध खरेदी रखडली

By admin | Updated: September 5, 2015 00:14 IST

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी अनुदानावर कीटकजन्य औषधी पुरविण्यात येतात.

जिल्हा परिषद : स्थायी समितीत विविध मुद्दे गाजलेअमरावती : जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी अनुदानावर कीटकजन्य औषधी पुरविण्यात येतात. मात्र ही औषधे अद्यापही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी स्थायी समितीत शुक्रवारी मांडला. यावर कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सभागृहातील माहीतीनुसार जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत केवळ संत्रा पिकांच्या संरक्षणासाठीच औषधे पुरविली जातात. सुमारे ५० लाख रूपयांची खरेदी ही सभागृहाची मान्यता नसल्याने रखडल्याचे सभागृहात सांगितले. अशातच अभ्यंकर यांच्या मागणीनुसार सध्या जिल्ह्यात कोरडया दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशी या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक पिकसंरक्षणाची औडधे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली. मात्र केवळ संत्रापिकावरील बुरशी रोगासाठीच जिल्हा परिषद कृषी विभागाची योजना आहे. सोयाबीन व कपाशी पिकासाठी औषध पुरविण्याची कुठलीही योजना नसल्याने ओषधे पुरविता येणार नसल्याचे कृषी विकास अधिकारी काथोडे यांनी सभागृहात सांगितले. यावेळी सभेत दलित वस्तीमधील विविध विकास कामांचा निधी मंजूर झाल्यानंतरही सन २०१३-१४ आणी २०१४-१५ या कामांचा पहिला हप्ता ग्रामपंचायतीला देण्यात आला नाही. त्यामुळे ही कामे ठप्प पडल्याचा मुद्दा सदस्य रवींंद्र मुंदे यांनी सभागृहात मांडल्यावर वादळी चर्चा झाली. (प्रतिनिधी)डेप्युटी सीईओ पाटील यांना 'शो कॉज' जिल्हा परिषदेतील रोजगार हमी योजना विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय पाटील हे जिल्हा परिषदेच्या कुठल्याही बैठकीला हजर राहत नसल्याचा मुद्दा सभागूहात सदस्यांनी मांडला यावर पिठासीन सभापती तथा अध्यक्ष सतीश उईके यांनी सर्वसंमतीने पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सभेचे सचिव आभाळे यांना दिले आहेत.शिरजगावच्या ग्रा.पं. सचिव यांच्यावर कारवाई होणारचांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथे सामान्य निधीमध्ये आर्थिक अनियमितता करून तत्कालीन सरपंच यांनी सामान्य फंडातील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा सुमारे २ लाख ८८ हजार रूपयांची रक्कम नियमबाह्य पद्धतीने सरपंचाचे पतीच्या नावाने काढून दिल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी बबलू देशमुख यांनी सभागृहात केली. यासंदर्भात डेप्युटी सिईओ जे.एन. आभाळे यांनी या प्रकरणाची चौकशी केली असून दोषी ग्रामसेवकावर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.