शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर-अंजनगाव राज्य महामार्गावर ५० अपघात

By admin | Updated: October 21, 2015 00:21 IST

दर्यापूर-अंजनगाव राज्य महामार्गावरील डांबर ठिकठिकाणी उखडले आहे. या मार्गाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

रस्त्यांवर खड्डेच खड्डे : प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधीही सुस्तलेहेगाव : दर्यापूर-अंजनगाव राज्य महामार्गावरील डांबर ठिकठिकाणी उखडले आहे. या मार्गाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. ५० हून अधिक अपघात घडले आहेत. दर्यापूर-अंजनगाव हा ३० कि. मी. अंतराचा राज्य मार्ग क्रमांक २१२ असल्याने जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या परिसरातून मध्य प्रदेशात जाण्यासाठी दर्यापूर-अंजनगाव मार्गावरून जावे लागते. त्यामुळे जड वाहनांसह या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून रस्ता देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. त्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या आधीच या मार्गाची डागडुजी करण्यात आली. परंतु तीन महिन्यांतच हा मार्ग ‘जैसे थे’ झाला. दर्यापूरहून निघाल्यानंतर टाटानगर भागात आदिवासी आश्रमशाळेसमोर हा मार्ग अतिशय खराब झाला आहे. विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करीत असल्याने त्या ठिकाणी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. येथून ये-जा करताना दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गाच्या दुर्दशेमुळे ५० हून अधिक घटना घडल्या आहेत. हा मार्ग दर्यापूर तर अंजनगावपर्यंत एकूण ११ गावांना जोडलेला आहे, हे विशेष. (वार्ताहर) दर्यापूर-अंजनगाव राज्य मार्ग दुरूस्तीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लवकरच हा मार्ग दुरूस्त करण्यात येईल. या मार्गावरून मी स्वत: ये-जा करीत असतो. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील नागरिकांची मला काळजी आहे. - रमेश बुंदिले, आमदार,दर्यापूर विधानसभा मतदारसंघ.सतत आपल्या पाठीला झटके बसल्याने पाठीचा आजार होतोच. परंतु सतत असेच होत राहिल्यास पाठीचा मणका तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंबर आणि पाठीचा त्रास अशा खड्डेयुक्त रस्त्यांमुळेच वाढतो. - डॉ.रवींद्र साबळे,नवजीवन हॉस्पिटल, दर्यापूर.