शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रबीसाठी साडेपाच कोटींचा पीक विमा मंजूर

By admin | Updated: March 4, 2017 00:10 IST

रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला.

मार्चअखेर होणार बँक खात्यात जमा : गव्हाला ९, हरभऱ्याला १० तालुक्यात ठेंगा अमरावती : रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. मार्च अखेरपावेतो बँकांद्वारा विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे सार्वत्रिक नुकसान झाले. मात्र भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा व दर्यापूर तालुक्यात हरभऱ्यासाठी विमा मिळणार आहे. उर्वरित १० तालुक्यांना ठेंगा दाखविला आहे. गव्हासाठी अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा व वरूड तालुक्यातच विमा भरपाई मिळणार आहे. उर्वरित ९ तालुक्यांना डावलले गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. रबीत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना नुकसान भरपाई मिळावी, यासासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. यामध्ये बागायती गव्हाकरिता ७५ महसूल मंडळ व हरभरासाठी ६४ महसूल मंडळात ही योजना होती. यात हरभरा पिकासाठी अचलपूर तालुक्यात १६०, अंजनगाव ७०२, भातकुली २१०५, चांदूरबाजार ३३८, चिखलदरा १०९, दर्यापूर ७९४९, धामणगाव २४०, धारणी १, मोर्शी ३९ व वरूड तालुक्यात १५९ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गव्हासाठी अचलपूर तालुक्यात २८, अमरावती ३३९, अंजनगाव सुर्जी ४५, भातकुली ७०, चांदूरबाजार ५०, चांदूररेल्वे ३७०, चिखलदरा १३७, धामणगाव ३२६, मोर्शी ४०, नांदगाव खंडेश्वर १६१७, तिवसा ३५५ व वरूड तालुक्यात १९३ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गव्हाला १० लाखांची विमा भरपाई भातकुली तालुक्यात ७० शेतकऱ्यांना ५८ हेक्टरसाठी एक लाख ४५ हजार १५७, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३३ शेतकऱ्यांना ३९ हेक्टर क्षेत्रासाठी २८ हजार ४५४, चांदूरबाजार तालुक्यात ५० शेतकऱ्यांना ४० हेक्टरसाठी एक लाख २२ हजार ३०७, चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना १२० हेक्टरसाठी ६ लाख ६१ हजार ९२१ व वरुड तालुक्यात १३० शेतकऱ्यांना २२० हेक्टरसाठी एक लाख १६ हजार १५५ रुपये असा एकूण १० लाख ७३ हजार ९९४ रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. कांदा, उन्हाळी भूईमूग निरंकउन्हाळी भूईमुगासाठी अंजनगाव सुर्जी व तिवसा तसेच कांद्यासाठी अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धामणगाव, मोर्शी व तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रबी पीक विमा काढला होता. मात्र या तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला विमा मंजूर झालेला नाही. विम्यात कंपनीद्वारा फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.