शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

रबीसाठी साडेपाच कोटींचा पीक विमा मंजूर

By admin | Updated: March 4, 2017 00:10 IST

रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला.

मार्चअखेर होणार बँक खात्यात जमा : गव्हाला ९, हरभऱ्याला १० तालुक्यात ठेंगा अमरावती : रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. मार्च अखेरपावेतो बँकांद्वारा विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे सार्वत्रिक नुकसान झाले. मात्र भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा व दर्यापूर तालुक्यात हरभऱ्यासाठी विमा मिळणार आहे. उर्वरित १० तालुक्यांना ठेंगा दाखविला आहे. गव्हासाठी अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा व वरूड तालुक्यातच विमा भरपाई मिळणार आहे. उर्वरित ९ तालुक्यांना डावलले गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. रबीत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना नुकसान भरपाई मिळावी, यासासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. यामध्ये बागायती गव्हाकरिता ७५ महसूल मंडळ व हरभरासाठी ६४ महसूल मंडळात ही योजना होती. यात हरभरा पिकासाठी अचलपूर तालुक्यात १६०, अंजनगाव ७०२, भातकुली २१०५, चांदूरबाजार ३३८, चिखलदरा १०९, दर्यापूर ७९४९, धामणगाव २४०, धारणी १, मोर्शी ३९ व वरूड तालुक्यात १५९ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गव्हासाठी अचलपूर तालुक्यात २८, अमरावती ३३९, अंजनगाव सुर्जी ४५, भातकुली ७०, चांदूरबाजार ५०, चांदूररेल्वे ३७०, चिखलदरा १३७, धामणगाव ३२६, मोर्शी ४०, नांदगाव खंडेश्वर १६१७, तिवसा ३५५ व वरूड तालुक्यात १९३ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गव्हाला १० लाखांची विमा भरपाई भातकुली तालुक्यात ७० शेतकऱ्यांना ५८ हेक्टरसाठी एक लाख ४५ हजार १५७, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३३ शेतकऱ्यांना ३९ हेक्टर क्षेत्रासाठी २८ हजार ४५४, चांदूरबाजार तालुक्यात ५० शेतकऱ्यांना ४० हेक्टरसाठी एक लाख २२ हजार ३०७, चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना १२० हेक्टरसाठी ६ लाख ६१ हजार ९२१ व वरुड तालुक्यात १३० शेतकऱ्यांना २२० हेक्टरसाठी एक लाख १६ हजार १५५ रुपये असा एकूण १० लाख ७३ हजार ९९४ रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. कांदा, उन्हाळी भूईमूग निरंकउन्हाळी भूईमुगासाठी अंजनगाव सुर्जी व तिवसा तसेच कांद्यासाठी अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धामणगाव, मोर्शी व तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रबी पीक विमा काढला होता. मात्र या तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला विमा मंजूर झालेला नाही. विम्यात कंपनीद्वारा फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.