शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

४९ शाळांतील विद्यार्थ्यांची होणार पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:36 IST

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

ठळक मुद्देधोरणाचा फटका : दहापेक्षा कमी पटसंख्या असल्याचा परिणाम

आॅनलाईन लोकमतअमरावती : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नजीकच्या गावातील शाळेसाठी आता तीन-चार किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे.कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे शासनाचे निर्देश आहेत. शून्य ते दहा पटसंख्येच्या शाळा बंद करून नजीकच्या शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन होणार आहे. पालकांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत जागरूकता आली आहे. त्यामुळे गुणवत्ता असणाºया शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. कमी पटसंख्येमुळे बंद झालेल्या शाळेतील शिक्षकांची पदस्थापना ही समायोजित शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात होणार आहे. त्या शाळांमध्येच त्या शिक्षकांचे वेतन काढले जाईल. परंतु, पहिली ते पाचवीच्या मुलांची यात पायपीट होणार आहे. शासनाच्या या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांबरोबर जिल्ह्यातील शिक्षकही अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. शिक्षकांची पदे रिक्त आहेतच. यामध्ये काहींचे समायोजन होतील. परंतु विद्यार्थ्यांना मात्र, पायपीट केल्याशिवाय पर्यायच नाही.यादी गुलदस्त्यात ?कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचा परिणाम ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर होणार आहे. जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्येच्या ४९ शाळा बंद होणार असल्या तरी त्या नेमक्या कोणत्या, याची यादी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील ४९ शाळा नजीकच्या शाळांमध्ये समायोजित करण्याचे निर्देश सर्व गटशिक्षणाधिकाºयांना दिले आहे. शासनाच्या सूचनेनुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे.- आर.डी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)