शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

४९ शाळांतील विद्यार्थ्यांची होणार पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:36 IST

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

ठळक मुद्देधोरणाचा फटका : दहापेक्षा कमी पटसंख्या असल्याचा परिणाम

आॅनलाईन लोकमतअमरावती : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नजीकच्या गावातील शाळेसाठी आता तीन-चार किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे.कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे शासनाचे निर्देश आहेत. शून्य ते दहा पटसंख्येच्या शाळा बंद करून नजीकच्या शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन होणार आहे. पालकांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत जागरूकता आली आहे. त्यामुळे गुणवत्ता असणाºया शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. कमी पटसंख्येमुळे बंद झालेल्या शाळेतील शिक्षकांची पदस्थापना ही समायोजित शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात होणार आहे. त्या शाळांमध्येच त्या शिक्षकांचे वेतन काढले जाईल. परंतु, पहिली ते पाचवीच्या मुलांची यात पायपीट होणार आहे. शासनाच्या या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांबरोबर जिल्ह्यातील शिक्षकही अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. शिक्षकांची पदे रिक्त आहेतच. यामध्ये काहींचे समायोजन होतील. परंतु विद्यार्थ्यांना मात्र, पायपीट केल्याशिवाय पर्यायच नाही.यादी गुलदस्त्यात ?कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचा परिणाम ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर होणार आहे. जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्येच्या ४९ शाळा बंद होणार असल्या तरी त्या नेमक्या कोणत्या, याची यादी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील ४९ शाळा नजीकच्या शाळांमध्ये समायोजित करण्याचे निर्देश सर्व गटशिक्षणाधिकाºयांना दिले आहे. शासनाच्या सूचनेनुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे.- आर.डी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)