शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

शेतकरी अपघात योजनेचे ४९ प्रस्ताव विमा कंपनीद्वारा नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:13 IST

अमरावती : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सन २०१७-१८ पासून आतापर्यंत ३३० प्रस्ताव विमा कंपनीला सादर केले ...

अमरावती : स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सन २०१७-१८ पासून आतापर्यंत ३३० प्रस्ताव विमा कंपनीला सादर केले होते. यापैकी फक्त १६१ प्रस्ताव कंपनीद्वारा मान्य करण्यात आले, तर १६१ प्रस्ताव कंपनीने फेटाळले. कंपनीद्वारा ४९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेले आहे. याशिवाय त्रुटीच्या पूर्ततेसाठी ७५ प्रस्ताव कृषी विभागाला परत पाठविल्याची माहिती आहे.

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास दोन लाखांपर्यंतचा विमा सदर शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबीयास मिळतो. विमा कंपनीद्वारा शेतकऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी काढून भरपाई देताना टाळाटाळ करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

या योजनेंतर्गत सन २०१७-१८ मध्ये ८३ पैकी ६६ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये ८९ प्रस्ताव विमा कंपनीला पाठविण्यात आले. यापैकी ५४ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आलेले आहेत. सन २०१९-२० मध्ये १५८ प्रस्ताव कृषी कंपनीद्वारा विमा कंपनीला पाठविण्यात आल्यानंतर यापैकी फक्त ४१ प्रस्ताव कंपनीद्वारा मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

अशी मिळते शेतकऱ्यांना मदत

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख, अपघातात दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख, अपघातात एक डोळा व दोन अवयन निकामी झाल्यास दोन लाख, अपघातात एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास विमा कंपनीद्वारा एक लाखापर्यंत मदत देण्यात येते.

बॉक्स

या कारणांसाठी शेतकऱ्यांना मदत

* वीज पडून मृत्यू , पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, याशिवाय वाहन अपघात

* लाभार्थी हा १० ते ७५ वयोगटातील विमा पॉलिसी लागू झालेला खातेदार असावा किंवा याच वयोगटातील कुटुंबातील एक सदस्य

* सात-बारा, मृत्यू दाखला, एफआयआर, अपघाताची प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा व वयाचा दाखला

बॉक्स

सर्पदंश, पाण्यात बुडल्याची अधिक प्रकरणे

या योजनेंतर्गत सर्पदंश व पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची सवार्धिक प्रकरणे दाखल झालेली आहेत. याशिवाय वीज पडून मृत्यू व अपघातामुळे मृत्यूची प्रकरणेदेखील दाखल आहेत. कंपनीद्वारा प्रकरणे मंजूर करण्यास बराच कालावधी लागत असल्याची बहुतांश शेतकऱ्यांची तक्रार आहे.

कोट

जिल्ह्यात तीन वर्षांत ३३० प्रकरणे विमा कंपनीला सादर केली. यामध्ये १६१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. ४९ नामंजूर व ७५ प्रकरणे त्रुटीच्या पूर्ततेत आहे. प्रलंबित व त्रुटीच्या प्रकरणासाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरू आहे.

- अनिल खर्चान,

उपसंचालक, कृषी विभाग

बॉक्स

शेतकरी अपघात योजनेची जिल्हास्थिती

वर्ष प्राप्त प्रस्ताव मंजूर नामंजूर्

२०१७-१८ ८३ ६६ ११

२०१८-१९ ८९ ५४ १९

२०१९-२० १५८ ४१ १९