शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

६४ पैकी ४९ तक्रारी महाबीज बियाण्यांच्या, अचलपूर उपविभागातील वास्तव : पेरले पण उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:09 IST

जिल्ह्याच्या अचलपूर उपविभागातील पाच तालुक्यांपैकी तीन तालुक्यात पेरलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याच्या ६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ४९ तक्रारींमध्ये न उगवलेले बियाणे महाबीजचेच आहे, हे विशेष.

वीरेंद्रकुमार जोगीअमरावती, दि. 23 - जिल्ह्याच्या अचलपूर उपविभागातील पाच तालुक्यांपैकी तीन तालुक्यात पेरलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याच्या ६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ४९ तक्रारींमध्ये न उगवलेले बियाणे महाबीजचेच आहे, हे विशेष.यातील सर्व बियाण्यांचा तपासणी अहवाल शेतकºयांना देण्यात आला आहे. कंपनी बियाणे सदोष असल्याचे मान्य करीत नसून हवामान व शेतकºयांचीच चूक दाखवून मोकळी होत आहे. अचलपूर उपविभागात अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा व धारणी तालुक्याचा समावेश होतो. यापैकी तीन तालुक्यांतून सर्वाधिक तक्रारी आहेत. दर्यापूर तालुक्यातून बियाण्यांच्या ३१ तक्रारी आहेत. त्यापैकी २९ तक्रारी महाबीजच्या आहेत. तर अंजनगाव तालुक्यातील १२ पैकी ११ तक्रारी व अचलपूर तालुक्यातील २१ पैकी ९ तक्रारींमध्ये महाबीजच्या बियाण्यांचा समावेश आहे.यासर्व तक्रारींवर कारवाई करण्यात आली असून बहुतांश तक्रारींचा अहवाल शेतकºयांना देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, यापेक्षा अधिक तक्रारींची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाबीजचे अधिकारी परस्पर शेतक-यांना भेटून त्यांनी शासकीय यंत्रणेकडे तक्रारी करून नये, यासाठी प्रलोभने देत आहेत. शेतकºयांनी तक्रार केल्यावर संबंधित शेतांची पाहणी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषीशास्त्रज्ञ (विद्यापीठाचा प्रतिनिधी) व कंपनीचा प्रतिनिधी यांची चमू तयार करण्यात येते. त्यांचा घटनास्थळावरील अहवालही महत्त्वाचा ठरतो, हे येथे विशेष.पावसाचे प्रमाण कमी-यंदा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर उपविभागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. अनेक शेतकºयांनी महाबीजचे सोयाबीन पेरले. मात्र, उगवण झाली नाही. सोयाबीनला आवश्यक असणारा पाऊस न झाल्यामुळे बियाणे उगवले नाही. आमच्यापर्यंत जेवढ्या तक्रारी आल्या त्यासर्व ठिकाणी भेटी दिल्याचे महाबीजच्या प्रतिनिधींनी सांगितले.आतापर्यंत प्राप्त सर्व तक्रारींवर कारवाई करीत नमुने घेण्यात आले आहेत. बहुतेक सर्व तक्र ारींचा अहवाल आला असून तो शेतकºयांना देण्यात आला आहे. यात तज्ज्ञांच्या मतांचा समावेश असतो. शास्त्रज्ञांचे मतही महत्त्वाचे ठरते.- प्रफुल्ल सातव,प्रभारी, उपविभागीय कृषी अधिकारी, अचलपूर