शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

६४ पैकी ४९ तक्रारी महाबीज बियाण्यांच्या, अचलपूर उपविभागातील वास्तव : पेरले पण उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:09 IST

जिल्ह्याच्या अचलपूर उपविभागातील पाच तालुक्यांपैकी तीन तालुक्यात पेरलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याच्या ६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ४९ तक्रारींमध्ये न उगवलेले बियाणे महाबीजचेच आहे, हे विशेष.

वीरेंद्रकुमार जोगीअमरावती, दि. 23 - जिल्ह्याच्या अचलपूर उपविभागातील पाच तालुक्यांपैकी तीन तालुक्यात पेरलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याच्या ६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून ४९ तक्रारींमध्ये न उगवलेले बियाणे महाबीजचेच आहे, हे विशेष.यातील सर्व बियाण्यांचा तपासणी अहवाल शेतकºयांना देण्यात आला आहे. कंपनी बियाणे सदोष असल्याचे मान्य करीत नसून हवामान व शेतकºयांचीच चूक दाखवून मोकळी होत आहे. अचलपूर उपविभागात अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा व धारणी तालुक्याचा समावेश होतो. यापैकी तीन तालुक्यांतून सर्वाधिक तक्रारी आहेत. दर्यापूर तालुक्यातून बियाण्यांच्या ३१ तक्रारी आहेत. त्यापैकी २९ तक्रारी महाबीजच्या आहेत. तर अंजनगाव तालुक्यातील १२ पैकी ११ तक्रारी व अचलपूर तालुक्यातील २१ पैकी ९ तक्रारींमध्ये महाबीजच्या बियाण्यांचा समावेश आहे.यासर्व तक्रारींवर कारवाई करण्यात आली असून बहुतांश तक्रारींचा अहवाल शेतकºयांना देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, यापेक्षा अधिक तक्रारींची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाबीजचे अधिकारी परस्पर शेतक-यांना भेटून त्यांनी शासकीय यंत्रणेकडे तक्रारी करून नये, यासाठी प्रलोभने देत आहेत. शेतकºयांनी तक्रार केल्यावर संबंधित शेतांची पाहणी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषीशास्त्रज्ञ (विद्यापीठाचा प्रतिनिधी) व कंपनीचा प्रतिनिधी यांची चमू तयार करण्यात येते. त्यांचा घटनास्थळावरील अहवालही महत्त्वाचा ठरतो, हे येथे विशेष.पावसाचे प्रमाण कमी-यंदा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर उपविभागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. अनेक शेतकºयांनी महाबीजचे सोयाबीन पेरले. मात्र, उगवण झाली नाही. सोयाबीनला आवश्यक असणारा पाऊस न झाल्यामुळे बियाणे उगवले नाही. आमच्यापर्यंत जेवढ्या तक्रारी आल्या त्यासर्व ठिकाणी भेटी दिल्याचे महाबीजच्या प्रतिनिधींनी सांगितले.आतापर्यंत प्राप्त सर्व तक्रारींवर कारवाई करीत नमुने घेण्यात आले आहेत. बहुतेक सर्व तक्र ारींचा अहवाल आला असून तो शेतकºयांना देण्यात आला आहे. यात तज्ज्ञांच्या मतांचा समावेश असतो. शास्त्रज्ञांचे मतही महत्त्वाचे ठरते.- प्रफुल्ल सातव,प्रभारी, उपविभागीय कृषी अधिकारी, अचलपूर