शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

४८६ गावांना पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST

जितेंद्र दखने अमरावती : जिल्हा परिषदेच्यावतीने पूृरस्थितीमुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार केला ...

जितेंद्र दखने

अमरावती : जिल्हा परिषदेच्यावतीने पूृरस्थितीमुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील २२ गावांची स्थिती पावसाळ्यात अतिसंवेदनशील होत असून, इतरांशी यापैकी काही गावांचा संपर्क तुटतो. त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना दरवर्षी फटका बसत असतो. यावर्षीदेखील पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे भाकीत वर्तविले जात आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्यावतीने यावर्षीचा म्हणजेच २०२१-२२ चा आपत्कालीन कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात ४८६ गावांना पुराचा फटका बसत असला तरी २२ गावे अतिसंवेदनशील आहेत. या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. यातील काही गावांना पुराचा वेढा पडतो. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यांच्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन केले आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर १, तालुका स्तरावर १४ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ५९ पथके स्थापन करण्यात आली आहेत.

बॉक्स

पूरस्थितीची तयारी

पूरबाधित अतिसंवेदनशील २२ गावांमध्ये निवारा, सॅनिटायझर, मास्क व औषध, किट पुरविण्यात येणार आहे. पाणी स्वच्छतेसाठी मेडिक्लोर, क्लोरिनद्वारे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल. पूरबाधित गावांच्या संबंधित आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिकेची सोय तसेच २६ फॉगिंग मशीन उपलब्ध केल्या जाणार आहेत.

बॉक्स

साथरोग नियंत्रण कक्ष

आगामी पावसाचे दिवस लक्षात घेता, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तावर कक्ष स्थापन हाेणार आहे. ७ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत नियंत्रण कक्षात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्ती केली जाणार आहे.

बॉक्स

अतिसंवेदनशील गावे

धारणी तालुक्यातील-तांगडा, चोपन, कावळाझिरी, किन्हाखेडा, कुट, धोकडा, सोनाबर्डी, डोलार, परसोली, पळकुंडी, चिखलदरा तालुक्यातील डोमी, कुही, रुईपठार, कुटीदा, सुमिता, कारंजखेडा, मारिता, राक्षा, अढाव, रेहट्याखेडा, बिच्छुखेडा, माडीझडप

बॉक़्स

नदीकाठच्या गावांची तालुकानिहाय संख्या

अमरावती ६३, भातकुली ३५, नांदगाव खंडेश्वर २४, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ५८, अचलपूर ५५, चांदूर बाजार २६, चांदूर बाजार ६, धामणगाव रेल्वे २७, तिवसा ४८, मोर्शी ३८, वरूड ५१, धारणी ७ आणि चिखलदरा तालुक्यातील सर्व गावे डोंगराळ भागातील असल्यामुळे पूरबाधित गावांची संख्या निरंक आहे.