शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

४८२ गावे पूरप्रवण प्रशासन सज्ज

By admin | Updated: June 23, 2015 00:51 IST

सन २०१४ च्या २७ जुलै रोजी पूर्णा व चारघड नदीकाठच्या सुमारे १५० गावांना महाप्रलयाचा फटका बसून ३ जीव गेले.

आपत्ती व्यवस्थापन : चारघड, पूर्णेसाठी उपाययोजनासुरेश सवळे चांदूरबाजारसन २०१४ च्या २७ जुलै रोजी पूर्णा व चारघड नदीकाठच्या सुमारे १५० गावांना महाप्रलयाचा फटका बसून ३ जीव गेले. हजारो घरांना पुराचा फटका बसला होता. त्यात कोट्यवधींची मालमत्ता नष्ट झाली. या पार्श्वभूमीवर पूर्णा व चारघड नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभवतो. जिल्ह्यातील अशा ४८२ पूरप्रवण गावांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे. मागील वर्षी पूर्णा प्रकल्पातून आपत्कालीन परिस्थितीत पाणी सोडण्यात आल्यानंतर ब्राह्मणवाडा थडी, देऊरवाडा, थूगाव, पिंपरी, कुरळ, धानोरा तसेच चारघड हा प्रकल्प आपत्कालीन परिस्थितीत ओव्हरफ्लो होत असल्यामुळे नदीकाठच्या घाटलाडकी, बेलमंडळीसह अनेक गावांमध्ये उद्भवलेल्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नैसर्गिक संकटांना सामोरे जाण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा सज्ज करणे, याला कायदेशीर महत्त्व प्राप्त झाले आहे. आपत्तीच्या काळात जीवितहानी तसेच वित्तहानी कमी करण्यासाठी पूर्वतयारीवर अधिक भर देण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने शोध व बचावकार्यासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ३ रबर बोटी खरेदी केल्या आहेत. या नोटींसह जिल्ह्यात २ फायबर बोटी, १२६ लाईफ बॉय रिंग्स, २२२ लाईफ जॅकेट्स इत्यादी साहित्य उपलब्ध आहेत. हे सर्व साहित्य ६ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारित ठेवण्यात आले आहे. बरेचदा दुर्गम भागात पूर आल्यास त्या गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली आल्याने शोध व बचाव कार्यास अडथळा निर्माण होतो, हे लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला. नद्या आणि नाल्यांच्या काठावर वसलेल्या ४८२ पूरप्रवण गावांची यादी तयार करण्यात आली आहे. या गावांमध्ये ग्रामआपत्ती निवारण दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, आरोग्यसेवक, कृषी सहायक, स्वस्त धान्य दुकानदार, अंगणवाडी सेविका, गावातील पट्टीचे पोहणाऱ्या ४ ते ६ युवक यांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये लाईफ जॅकेट, मेगा फोन, सर्च लाईट, दोरी हे साहित्य पुरविण्यात आले आहेत.या दलातील सदस्यांना बचाव साहित्याचा वापर करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यरत राहणार आहे. उपविभागीय स्तरावरही व्यवस्थापन यंत्रणा अस्तित्वात आहे. तालुका आणि गाव पातळीवरही आपत्ती निवारण दल सज्ज असेल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारितील दलात महापालिकेच्या अग्निशमन विभागातील ७, जिल्हा गृहरक्षक दल आणि पोलीस मुख्यालयातील प्रत्येकी ८ शहर पोलीस विभागातील ९, तसेच राज्य राखीव पोलीस दलातील ८ सदस्यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १२,२१२ चौ. कि. मी.आहे. वनाखालील क्षेत्र ३,५०२ चौ. कि.मी. आहे. वर्धा नदीने अमरावती आणि वर्धा हे दोन जिल्हे वेगळे केले आहेत. पूर्णा, तापी, चंद्रभागा आणि बेंबळा या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. याशिवाय धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यानंतरही बिकट स्थिती निर्माण होते. २००७ मध्ये अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील अनेक भागात हाहाकार माजला होता.