शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

४६ लघुप्रकल्प कोरडे

By admin | Updated: May 7, 2017 00:12 IST

मागील महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे ....

धोक्याची घंटा : ६.०६ टीएमसी, २९ टक्के जलसाठालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे व जमिनीतील पाण्याची पातळीदेखील झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील ४६ लघुप्रकल्पाची स्थिती गंभीर आहे. या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ६.०६ दलघमी म्हणजेच २९.२३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असणाऱ्या शहानूर प्रकल्पात ४६.०४ टीएमसी साठ्याच्या तुलनेत सध्या २३.२० टीएमसी साठा आहे. ही ५०३९ टक्केवारी आहे. पूर्णा मध्यम प्रकल्पात संकलित ३५.३८ टीएमसी साठ्याच्या तुलनेत ८.३८ टीएमसी साठा आहे. ही २३.६९ टक्केवारी आहे. तसेच चंद्रभागा प्रकल्पात संकलीत ४१.२५ दलघमी साठ्याच्या तुलनेत २१.६१ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ५२.३९ टक्केवारी आहे. लघुप्रकल्पामध्ये साखळी प्रकल्पात १६.०३२ टक्के, पिंपळगाव प्रकल्पात ८.३३ टक्के, माळेगाव प्रकल्पात २८.७५ टक्के, दस्तापूर ३०.२४, केकतपूर ३४.७६, दहीगाव धानोरा १८.७८, खनिजापूर १०५९, मालखेड १५.०७, सरस्वती २६.२२, भिवापूर १४.९०, वाई १८.९२, नागठाना १३.४५, साद्राबाडी ११.३६, पुसली २१.६२, नांदुरी १९.८१ व चारघड प्रकल्पात २६.२४ टक्के साठा शिल्लक आहे. एकूण तीन मध्यम प्रकल्पांत संकलित १२२.६७ दलघमी पाणी साठ्याच्या तुलनेत ५३.१९ दलघमी म्हणजेच ४३.३६ टक्के साठा शिल्लक आहे. यापूर्वी सन २०१२ मध्ये ५३.९० दलघमी, २०१३ मध्ये ६०.८४ दलघमी, २०१४ मध्ये ६९.३० दलघमी व २०१५ मध्ये ७३.१३ दलघमी साठा शिल्लक होता. अशीच स्थिती राहिल्यास महिन्या अखेरीस अनेक प्रकल्प कोरडे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सध्यास दिलासाजनक साठा आहे. मात्र, मध्यम व लघु प्रकल्पांनी चिंता वाढविली आहे. सध्या मध्यम प्रकल्पातून पाण्याच्या योजना व शेतीसाठी वापर होत आहे. गेल्या महिन्यापासून दिवसाच्या प्रचंड उष्णतामानामुळे या प्रकल्पातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे असल्याने चिंता वाढली आहे. या लघुप्रकल्पांची स्थिती गंभीरसद्यस्थितीत गोंडवाघोली, गोंडविहीर, दाभेरी, शेतकरी, पंढरी, बेलसावंगी, जमालपूर, सावलीखेडा, लवादा, गमेनरी, ज्यूटपाणी, हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. पिंपळगाव प्रकल्पात ८.३३ टक्के, सूर्यगंगा ५.९७, सावरपाणी ३.२८, बासलापूर ७.७५, टाकळी ४.१३, अमदोरी २.३७, त्रिवेणी ६.३१, जामगाव ६.२५, खारी ६.२२, गावलानडोह १.९४, मांडवा ३.९६, बोबदो २.९२, रभांग ३.६०, सालई ०.७१, मोगर्दा प्रकल्पात केवळ ४.३५ टक्केच जलसाठा आहे. हे प्रकल्प मे अखेरीस कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे.