शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४५६ गावे अतिधोक्याची

By admin | Updated: June 7, 2015 00:27 IST

विविध आजारांचा सलग काही वर्षांपासून होत असलेला उद्रेक नदीच्या काठावरील तसेच लाल कार्ड मिळालेली गावे ....

उपाययोजना : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्कअमरावती : विविध आजारांचा सलग काही वर्षांपासून होत असलेला उद्रेक नदीच्या काठावरील तसेच लाल कार्ड मिळालेली गावे आणि पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील सुमारे ४८६ गावे अतिधोक्याची जाहीर करण्यात आली आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्याच्या सोयी सुविधांसंदर्भात उपाययोजना सुरू केल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जिल्ह्यात अतिधोक्याच्या गावांवर लक्ष ठेवण्याचा आराखडा तयार करण्यात येतो. गावांमध्ये आरोग्याच्या कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक कांचन जगताप यांनी संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात साथीच्या विविध आजारांचा उद्रेक होतो. सलग तीन वर्षांपासून गावांमध्ये आजारांचा झालेला उद्रेक नदी काठावरील गाव तसेच पाण्याचा शुद्धीकरणाच्या अभावामुळे मिळालेल्या लालकार्ड आणि पाणीटंचाई यासारख्या कारणास्तव अशा गावांना अतिधोक्याची गावे म्हणून संबोधले जाते. दरवर्षी अशी अतिधोक्याची गावे जाहीर केली जातात. त्या गावांवर आरोग्य खाते लक्ष केंद्रित करुन उपाययोजना करणे, अशी जिल्ह्यात १९०० पेक्षा जास्त गावे आहेत. त्यापैकी ४८६ गावे अतिधोक्यांची गावे म्हणून जाहीर केली आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत अशा गावांची संख्या घटली आहे. मागील पाच वर्षांत अतिधोक्याच्या गावांची संख्या बऱ्यापैकी घटली आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजमितीस अमरावती जिल्ह्यात सुमारे ४८६ गावे अतिधोक्याची आहेत. (प्रतिनिधी)अशी आहेत तालुकानिहाय गावसंख्याअमरावती ६३, भातकुली ३५, नांदगाव खंडेश्वर २४, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ५८, अचलपूर ५५, चांदूरबाजार २६, धामणगाव रेल्वे २७, तिवसा ४८, मोर्शी ३८, वरुड ५१, धारणी ७ तर चिखलदरा तालुक्यातील सर्व गावे पहाडी क्षेत्रात असल्याने येथे नुकसान नाही.दरवर्षी पावसाळ्यात बहुतेक साथरोगाचा अधिक फैलाव नदीपात्रालगतच्या गावांत होतो. त्यामुळे या गावांवर विशेष लक्ष ठेवून आरोग्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. - नितीन भालेराव, आरोग्य अधिकारी, जि.प.