शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४५६ गावे अतिधोक्याची

By admin | Updated: June 7, 2015 00:27 IST

विविध आजारांचा सलग काही वर्षांपासून होत असलेला उद्रेक नदीच्या काठावरील तसेच लाल कार्ड मिळालेली गावे ....

उपाययोजना : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्कअमरावती : विविध आजारांचा सलग काही वर्षांपासून होत असलेला उद्रेक नदीच्या काठावरील तसेच लाल कार्ड मिळालेली गावे आणि पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील सुमारे ४८६ गावे अतिधोक्याची जाहीर करण्यात आली आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्याच्या सोयी सुविधांसंदर्भात उपाययोजना सुरू केल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी जिल्ह्यात अतिधोक्याच्या गावांवर लक्ष ठेवण्याचा आराखडा तयार करण्यात येतो. गावांमध्ये आरोग्याच्या कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक कांचन जगताप यांनी संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात साथीच्या विविध आजारांचा उद्रेक होतो. सलग तीन वर्षांपासून गावांमध्ये आजारांचा झालेला उद्रेक नदी काठावरील गाव तसेच पाण्याचा शुद्धीकरणाच्या अभावामुळे मिळालेल्या लालकार्ड आणि पाणीटंचाई यासारख्या कारणास्तव अशा गावांना अतिधोक्याची गावे म्हणून संबोधले जाते. दरवर्षी अशी अतिधोक्याची गावे जाहीर केली जातात. त्या गावांवर आरोग्य खाते लक्ष केंद्रित करुन उपाययोजना करणे, अशी जिल्ह्यात १९०० पेक्षा जास्त गावे आहेत. त्यापैकी ४८६ गावे अतिधोक्यांची गावे म्हणून जाहीर केली आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत अशा गावांची संख्या घटली आहे. मागील पाच वर्षांत अतिधोक्याच्या गावांची संख्या बऱ्यापैकी घटली आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजमितीस अमरावती जिल्ह्यात सुमारे ४८६ गावे अतिधोक्याची आहेत. (प्रतिनिधी)अशी आहेत तालुकानिहाय गावसंख्याअमरावती ६३, भातकुली ३५, नांदगाव खंडेश्वर २४, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ५८, अचलपूर ५५, चांदूरबाजार २६, धामणगाव रेल्वे २७, तिवसा ४८, मोर्शी ३८, वरुड ५१, धारणी ७ तर चिखलदरा तालुक्यातील सर्व गावे पहाडी क्षेत्रात असल्याने येथे नुकसान नाही.दरवर्षी पावसाळ्यात बहुतेक साथरोगाचा अधिक फैलाव नदीपात्रालगतच्या गावांत होतो. त्यामुळे या गावांवर विशेष लक्ष ठेवून आरोग्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. - नितीन भालेराव, आरोग्य अधिकारी, जि.प.