शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

पीक विम्याला मुकले ४५ हजार शेतकरी

By admin | Updated: July 12, 2014 00:37 IST

हवामानावर आधारित पीक विमा योजनेला मागील हंगामात १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती.

गजानन मोहोड अमरावतीहवामानावर आधारित पीक विमा योजनेला मागील हंगामात १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. यंदा, मात्र जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यातील ९० टक्के क्षेत्रात अद्याप पेरणी व्हावयाची आहे. अशा स्थितीत ही पीक विमा योजना शासनाने गुंडाळली आहे. या योजनेला जुलै २०१४ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालयाने कृषी आयुक्तांकडे सादर केला होता. परंतु तरीही मुदतवाढ नाकारली गेली. त्यामुळे हजारोे शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले. पावसाचा लहरीपणा, नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण, अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या हवामान घटकांच्या तीन धोक्यांपासून संरक्षण देणारी ही योजना होती. जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसूचित महसूल मंडळस्तरावर क्षेत्र घटकांना गृहित धरून ही योजना राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. या योजनेची मुदत ३० जून निर्धारित होती. परंतु कृषी आयुक्त कार्यालयाने मुदतवाढ दिली नाही.योजनेचा ‘ट्रीगर’ कमी पर्जन्यमानहवामानावर आधारित पीक विमा योजनेचा ट्रीगर कमी पर्जन्यमान हा आहे. नेमके यावर्षी खरिपाच्या हंगामात ४० दिवसांत केवळ दोन दिवस पाऊस पडला. योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली असती तर लाखो शेतकऱ्यांना योजनेच्या पहिल्या टप्प्यात ८० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे १० मि.मी. पर्जन्यमानासाठी २७५ रुपये या परिमाणानुुसार प्रतीहेक्टर २२०० रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली असती. जिल्ह्यात बँकांचे ४५ हजार ३६० कर्जदार सभासदहवामानावर आधारित पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची करण्यात आली होती. जिल्हा सहकारी बँकेसह इतर सर्व बँकांचे ४५,३६० कर्जदार सभासद आहेत. या सर्व शेतकऱ्यांना योजना सक्तीची होती. प्रत्यक्षात योजनेची मुदत ३० जून रोजी संपली, तेव्हा या शेतकऱ्यांची पेरणी व्हायची होती. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. परिणामी सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही.