शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याला मुकले ४५ हजार शेतकरी

By admin | Updated: July 12, 2014 00:37 IST

हवामानावर आधारित पीक विमा योजनेला मागील हंगामात १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती.

गजानन मोहोड अमरावतीहवामानावर आधारित पीक विमा योजनेला मागील हंगामात १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. यंदा, मात्र जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यातील ९० टक्के क्षेत्रात अद्याप पेरणी व्हावयाची आहे. अशा स्थितीत ही पीक विमा योजना शासनाने गुंडाळली आहे. या योजनेला जुलै २०१४ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालयाने कृषी आयुक्तांकडे सादर केला होता. परंतु तरीही मुदतवाढ नाकारली गेली. त्यामुळे हजारोे शेतकरी पिकविम्यापासून वंचित राहिले. पावसाचा लहरीपणा, नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण, अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या हवामान घटकांच्या तीन धोक्यांपासून संरक्षण देणारी ही योजना होती. जिल्ह्यात पथदर्शक स्वरुपात अधिसूचित महसूल मंडळस्तरावर क्षेत्र घटकांना गृहित धरून ही योजना राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. या योजनेची मुदत ३० जून निर्धारित होती. परंतु कृषी आयुक्त कार्यालयाने मुदतवाढ दिली नाही.योजनेचा ‘ट्रीगर’ कमी पर्जन्यमानहवामानावर आधारित पीक विमा योजनेचा ट्रीगर कमी पर्जन्यमान हा आहे. नेमके यावर्षी खरिपाच्या हंगामात ४० दिवसांत केवळ दोन दिवस पाऊस पडला. योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली असती तर लाखो शेतकऱ्यांना योजनेच्या पहिल्या टप्प्यात ८० मि.मी.पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे १० मि.मी. पर्जन्यमानासाठी २७५ रुपये या परिमाणानुुसार प्रतीहेक्टर २२०० रुपयाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली असती. जिल्ह्यात बँकांचे ४५ हजार ३६० कर्जदार सभासदहवामानावर आधारित पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची करण्यात आली होती. जिल्हा सहकारी बँकेसह इतर सर्व बँकांचे ४५,३६० कर्जदार सभासद आहेत. या सर्व शेतकऱ्यांना योजना सक्तीची होती. प्रत्यक्षात योजनेची मुदत ३० जून रोजी संपली, तेव्हा या शेतकऱ्यांची पेरणी व्हायची होती. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. परिणामी सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही.