शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तीन महिन्यातच स्वच्छता विभागाचा साडेचार कोटी खर्च - जिल्हा परिषद

By जितेंद्र दखने | Updated: June 16, 2023 19:46 IST

जिल्हा परिषदेच्या काही विभागात दोन वर्षानंतर ही निधी अखर्चित राहत असताना मात्र स्वच्छ भारत मिशन विभागाने चक्क तीन महिन्यातच ४ कोटी ४७ लाख रूपयांचा विविध उपक्रमांवर खर्च केला आहे.

अमरावती : जिल्हा परिषदेच्या काही विभागात दोन वर्षानंतर ही निधी अखर्चित राहत असताना मात्र स्वच्छ भारत मिशन विभागाने चक्क तीन महिन्यातच ४ कोटी ४७ लाख रूपयांचा विविध उपक्रमांवर खर्च केला आहे. त्यामुळे विभागातील पाच जिल्ह्यात हा विभाग खर्चात हा विभाग अव्वल ठरला आहे. यामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन योजनेकरिता हा खर्च करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन चालविल्या जाते. या विभागाला सन २०२३ २४ या चालू आर्थिक वर्षांकरिता ५ कोटी ५५ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. मार्च २०२३ मध्ये या विभागाला शासनाकडून हा निधी सुपूर्द करण्यात आला.

 सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी १ कोटी ३ लाख ४० हजार, सांडपाणी व व्यवस्थापनासाठी ३ कोटी ९६ लाख वैयक्तिक शौचालयाकरिता ५५ लाख ४० हजारांचा निधी प्राप्त झाला. यामधून सार्वजनिक स्वच्छतागृहाकरिता ७३ लाख ५० हजार,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाकरिता ३ कोटी ३ लाख व वैयक्तिक शाैचालयाकरिता ४४ लाख २८ हजारांचा निधी या तीन महिन्यातच खर्च करण्यात आला आहे. याची टक्केवारी ८०.६० टक्के एवढी आहे. या खर्चाकरिता मार्च २०२४ पर्यंत मुदत होती. परंतु या विभागाने तीन महिन्यातच हा खर्च करून विभागात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गतिमान खर्च करणाऱ्या तालुक्यांमध्ये चिखलदरा, अमरावती, दर्यापूर आणि वरूड या चार तालुक्यांचा समावेश आहे.या तालुक्यांत शंभर टक्के निधी खर्च झाला आहे. अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्याचा खर्च ९९ टक्क्यांच्या वर आहे. मात्र खर्च करण्यात मोर्शी आणि भातकुली हे दोन तालुके माघारले असल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामीण भागात कामेही प्रगतिपथावरजिल्हा परिषद स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध योजनेंतर्गत कामे केली आहे. जिल्हा परिषद स्वच्छता विभाग पुढे आहे. तीन महिन्यात ४ कोटींच्या वर निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावती