शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

तीन महिन्यातच स्वच्छता विभागाचा साडेचार कोटी खर्च - जिल्हा परिषद

By जितेंद्र दखने | Updated: June 16, 2023 19:46 IST

जिल्हा परिषदेच्या काही विभागात दोन वर्षानंतर ही निधी अखर्चित राहत असताना मात्र स्वच्छ भारत मिशन विभागाने चक्क तीन महिन्यातच ४ कोटी ४७ लाख रूपयांचा विविध उपक्रमांवर खर्च केला आहे.

अमरावती : जिल्हा परिषदेच्या काही विभागात दोन वर्षानंतर ही निधी अखर्चित राहत असताना मात्र स्वच्छ भारत मिशन विभागाने चक्क तीन महिन्यातच ४ कोटी ४७ लाख रूपयांचा विविध उपक्रमांवर खर्च केला आहे. त्यामुळे विभागातील पाच जिल्ह्यात हा विभाग खर्चात हा विभाग अव्वल ठरला आहे. यामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन योजनेकरिता हा खर्च करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन चालविल्या जाते. या विभागाला सन २०२३ २४ या चालू आर्थिक वर्षांकरिता ५ कोटी ५५ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. मार्च २०२३ मध्ये या विभागाला शासनाकडून हा निधी सुपूर्द करण्यात आला.

 सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी १ कोटी ३ लाख ४० हजार, सांडपाणी व व्यवस्थापनासाठी ३ कोटी ९६ लाख वैयक्तिक शौचालयाकरिता ५५ लाख ४० हजारांचा निधी प्राप्त झाला. यामधून सार्वजनिक स्वच्छतागृहाकरिता ७३ लाख ५० हजार,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाकरिता ३ कोटी ३ लाख व वैयक्तिक शाैचालयाकरिता ४४ लाख २८ हजारांचा निधी या तीन महिन्यातच खर्च करण्यात आला आहे. याची टक्केवारी ८०.६० टक्के एवढी आहे. या खर्चाकरिता मार्च २०२४ पर्यंत मुदत होती. परंतु या विभागाने तीन महिन्यातच हा खर्च करून विभागात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गतिमान खर्च करणाऱ्या तालुक्यांमध्ये चिखलदरा, अमरावती, दर्यापूर आणि वरूड या चार तालुक्यांचा समावेश आहे.या तालुक्यांत शंभर टक्के निधी खर्च झाला आहे. अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्याचा खर्च ९९ टक्क्यांच्या वर आहे. मात्र खर्च करण्यात मोर्शी आणि भातकुली हे दोन तालुके माघारले असल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामीण भागात कामेही प्रगतिपथावरजिल्हा परिषद स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध योजनेंतर्गत कामे केली आहे. जिल्हा परिषद स्वच्छता विभाग पुढे आहे. तीन महिन्यात ४ कोटींच्या वर निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावती