शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

४३ कंत्राटदार : स्वच्छतेवर १३ कोटींचा खर्च

By admin | Updated: July 26, 2016 23:57 IST

आठ लाख अमरावतीकरांचे आरोग्य निरामय रहावे, यासाठी महापालिका वर्षाकाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करते.

 स्मार्टसिटीचा घाण चेहरा ! अमरावती : आठ लाख अमरावतीकरांचे आरोग्य निरामय रहावे, यासाठी महापालिका वर्षाकाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करते. तथापि कोट्यवधींचा खर्च होऊनही महानगराचा चेहरा मात्र अस्वच्छच आहे. अन्य ऋतुंच्या तुलनेत पावसाळ्यात स्वच्छता विभागाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या फेरीत स्वत:ला ‘प्रोजेक्ट’ करणाऱ्या अमरावती महानगराचा चेहरा घाणीने बरबटलेला आहे. शहरात सर्वदूर साचलेले कचऱ्याचे ढीग, त्यावर ताव मारणारी डुकरे, तुंबलेल्या नाल्या आणि गटारी हे चित्र स्वच्छता आणि आरोग्याचा बोजवारा उडाल्याचे दर्शक आहे. महापालिकेच्या ४३ प्रभागात ४३ कंत्राटदारांच्या ११४६ आणि महापालिकेचा सेवेत असलेल्या सफाई कामगारांकडून शहराची साफसफाई करण्यात येते. मात्र, मुस्लिमबहूल क्षेत्र आणि झोपडपट्टीत कधीही कचरा संकलनाची रिक्षा फिरत नाही. इतवारा बाजारातील भाजीपाला मार्केटमधील लाईनमध्ये मृत वराह आणि स्वच्छतेचा उडालेला बोजवारा यंत्रणेवर दोषारोप करणाराच आहे. महापालिकेच्या अखत्यारितील ४३ प्रभागात कमी-अधिक प्रमाणात स्वच्छतेची बोंबाबोंब आहे. प्रत्येक प्रभागात कंत्राटदारांच्या कामगारांसह महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी कार्यरत असताना सुद्धा घाणीने कळस गाठला आहे. कंत्राटदार आणि स्वच्छता कामगारांवर १३ कोटींहून अधिक रक्कम खर्च होत असली तरी अमरावतीकरांना यातून केवळ आजारच मिळतात. इतवारा बाजार व मुस्लिमबहूल परिसरातील परिस्थिती तर अत्यंत विदारक आहे. या भागातील कचरा महिनोन्महिने उचलला जात नाही. टक्केवारीमुळे अभय अमरावती : सफाई कंत्राटदाराला महापालिका महिन्याकाठी २ लाख ५६ हजार रुपयांचा मोबदला देण्यात येतो. महिन्याकाठी ही रक्कम १ कोटी १० लाखांपर्यंत जाते. त्यामुळे शहर स्वच्छ असणे अपेक्षित आहे. मात्र, कंत्राटदारांची मनमानी व संबंधितांशी आर्थिक लागेबांधे यामुळे अस्वच्छतेवर कुणीही बोलायला तयार नाही. एकंदरीतच स्वच्छतेबाबतचा कंत्राट आणि अन्य बाबींमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने बहुतांश खासगी कंत्राटदारांना टक्केवारीमुळे अभय दिल्याचा आरोप सर्वश्रुत आहे.