शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

४३९ संस्था निघणार अवसायनात

By admin | Updated: October 4, 2015 00:56 IST

बिनकामाच्या, ठावठिकाणा नसणाऱ्या व केवळ कागदोपत्री अस्तित्व असणाऱ्या ४३९ सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

लोकमत  विशेषगजानन मोहोड अमरावतीबिनकामाच्या, ठावठिकाणा नसणाऱ्या व केवळ कागदोपत्री अस्तित्व असणाऱ्या ४३९ सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. १ जुलैपासून सहकार विभागाने जिल्ह्यातील २३५१ सहकारी संस्थाचे सर्वेक्षण केले असता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अशा संस्थांना आता निबंधकाद्वारा समापन करण्यात येऊन चालू असणाऱ्या संस्थांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. राज्याच्या सहकार विभागाद्वारा जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण विशेष मोहिमेद्वारे १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत करण्यात आले. जिल्ह्यात नोंदणीकृत २ हजार ३५१ सहकारी संस्थाचे ८४ कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारा ३० सप्टेंबरपर्यंत ९९ टक्के म्हणजेच २ हजार ३२१ संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये केवळ १ हजार ८८२ संस्था चालू स्थितीत आढळल्यात, २३६ संस्था बंद आहेत, ८९ संस्थांचे कार्य स्थगित आहे, तर ११४ संस्थांचा ठावठिकाणा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आढळून आलेला नाही. अशा एकूण ४३९ संस्था आता अवसायनात काढण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (क) मधील तरतुदीनुसार या कागदोपत्री सहकारी संस्थांवर ही कारवाई केली जाणार आहे.