शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जिल्ह्यातील ४.२८ लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST

कोरोना संचारबंदीत काळात अंत्योदय, प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना ५ किलो रेशन अमरावती; कोरोनाचा वाढता संसर्ग विस्कळीत झालेले जनजीवन आणि व्यवहार ...

कोरोना संचारबंदीत काळात अंत्योदय, प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना ५ किलो रेशन

अमरावती; कोरोनाचा वाढता संसर्ग विस्कळीत झालेले जनजीवन आणि व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक दुर्बल घटकासमोर रोजी रोटीचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लागू करतानाच दुर्बल घटकांना मदतीचा हात दिल्याने दिलासा मिळाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदयमधील १ लाख २३ हजार ८९१ रेशन कार्डधारक आणि प्राधान्य गटातील ३०४१२० रेशन कार्डधारक अशा ४ लाख २८ हजार कुटुंबांना मोफत धान्य लाभ मिळणार आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहणार असल्याने गरजूंची अडचण होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रथमत दारिद्र्यरेषेखालील सर्व लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यत्या ३० एप्रिलपर्यंत दिवस संचारबंदी असल्याने मिळणारे पाच किलो धान्य लाभार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाला योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिनस्त यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मोफत धान्य वितरणाची कारवाई केली जात आहे.

बॉक्स

लाभार्थ्यांना मिळणार गहू तांदळाचा लाभ

राज्य शासनाने दारिद्र्यरेषेखालील व प्राधान्य गटातील लोकांना दिलासा दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अभियानात आता दुर्बल घटकासह प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी प्रधानमंत्री गरीब कल्याण निर्णय अजूनही लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळाले होते. आता राज्य शासनाने दिलासा देत निर्बंध लागू योजनाही लागू केल्याने जिल्ह्यातील ४ हजारावर लाख ९७ हजारावर कुटुंबांची सोय झाली आहे.

बॉक्स

गत वर्षाभरापासून कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेकांच्या हाताला काम नाही. यामुळे या घटकांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने दिलेल्या मोफत धान्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बॉक्स

तालुकानिहाय लाभार्थी कुटुंबांची संख्या

अचलपूर -२२३१९

अमरावती-२२२९४

अमरावती शहर -३२०९३

अंजनगाव सुर्जी -२८१००

चांदूर बाजार -२८४१८

चांदूर रेल्वे -१५७६३

चिखलदरा -७६०५४

दर्यापूर-२५३०३

धामणगाव रेल्वे -१९०२९

धारणी -१०८२८७

मोर्शी-३०५०७

नांदगाव खंडेश्वर-१९३३९

भातकुली-१८०१०

तिवसा -१५८१०

वरूड -३५२०२

बॉक्स

जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या

४९७५२८

बॉक्स

दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी

कोरोनामुळे अगोदरच हातचे काम गेल्याने चूल पेटवण्याची चिंता असते. मोफत धान्य मिळणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे.

लाडकुबाई सहारे

लाभार्थी

कोट

कोरोनामुळे शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आमचा रोजगार बंद आहे. परिणामी, मोफत धान्यामुळे आम्हाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

रंगराव मेश्राम

लाभार्थी

कोट

गेल्या वर्षभरापासून अडचणी सुरूच आहेत. त्यात अजूनही काम सुरू नाही. आता पुन्हा लाॅकडाऊन लागल्याने आम्हाला मदत कोण करणार! आताची धान्याची मदत होत असली तरी आर्थिक अडचण सुरू आहे.

सुभद्राबाई मानकर

लाभार्थी.