शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

जिल्ह्यातील ४.२८ लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST

कोरोना संचारबंदीत काळात अंत्योदय, प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना ५ किलो रेशन अमरावती; कोरोनाचा वाढता संसर्ग विस्कळीत झालेले जनजीवन आणि व्यवहार ...

कोरोना संचारबंदीत काळात अंत्योदय, प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना ५ किलो रेशन

अमरावती; कोरोनाचा वाढता संसर्ग विस्कळीत झालेले जनजीवन आणि व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक दुर्बल घटकासमोर रोजी रोटीचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लागू करतानाच दुर्बल घटकांना मदतीचा हात दिल्याने दिलासा मिळाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदयमधील १ लाख २३ हजार ८९१ रेशन कार्डधारक आणि प्राधान्य गटातील ३०४१२० रेशन कार्डधारक अशा ४ लाख २८ हजार कुटुंबांना मोफत धान्य लाभ मिळणार आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहणार असल्याने गरजूंची अडचण होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रथमत दारिद्र्यरेषेखालील सर्व लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यत्या ३० एप्रिलपर्यंत दिवस संचारबंदी असल्याने मिळणारे पाच किलो धान्य लाभार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाला योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिनस्त यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मोफत धान्य वितरणाची कारवाई केली जात आहे.

बॉक्स

लाभार्थ्यांना मिळणार गहू तांदळाचा लाभ

राज्य शासनाने दारिद्र्यरेषेखालील व प्राधान्य गटातील लोकांना दिलासा दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अभियानात आता दुर्बल घटकासह प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी प्रधानमंत्री गरीब कल्याण निर्णय अजूनही लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळाले होते. आता राज्य शासनाने दिलासा देत निर्बंध लागू योजनाही लागू केल्याने जिल्ह्यातील ४ हजारावर लाख ९७ हजारावर कुटुंबांची सोय झाली आहे.

बॉक्स

गत वर्षाभरापासून कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेकांच्या हाताला काम नाही. यामुळे या घटकांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने दिलेल्या मोफत धान्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बॉक्स

तालुकानिहाय लाभार्थी कुटुंबांची संख्या

अचलपूर -२२३१९

अमरावती-२२२९४

अमरावती शहर -३२०९३

अंजनगाव सुर्जी -२८१००

चांदूर बाजार -२८४१८

चांदूर रेल्वे -१५७६३

चिखलदरा -७६०५४

दर्यापूर-२५३०३

धामणगाव रेल्वे -१९०२९

धारणी -१०८२८७

मोर्शी-३०५०७

नांदगाव खंडेश्वर-१९३३९

भातकुली-१८०१०

तिवसा -१५८१०

वरूड -३५२०२

बॉक्स

जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या

४९७५२८

बॉक्स

दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी

कोरोनामुळे अगोदरच हातचे काम गेल्याने चूल पेटवण्याची चिंता असते. मोफत धान्य मिळणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे.

लाडकुबाई सहारे

लाभार्थी

कोट

कोरोनामुळे शासनाने १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आमचा रोजगार बंद आहे. परिणामी, मोफत धान्यामुळे आम्हाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

रंगराव मेश्राम

लाभार्थी

कोट

गेल्या वर्षभरापासून अडचणी सुरूच आहेत. त्यात अजूनही काम सुरू नाही. आता पुन्हा लाॅकडाऊन लागल्याने आम्हाला मदत कोण करणार! आताची धान्याची मदत होत असली तरी आर्थिक अडचण सुरू आहे.

सुभद्राबाई मानकर

लाभार्थी.